अतनूर / प्रतिनिधी : येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य चौकातील छत्रपती शिवराय चौकात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त विजयादशमी दिनी शुक्रवारी कार्यक्रम घेण्यात आला. रिपाईचे जळकोट तालुका अध्यक्ष विनोद कांबळे यांच्या हस्ते तथागत गौतमबुद्ध, छत्रपती शिवाजीमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पंचशील, बुद्धवंदना घेण्यात आली.
यावेळी अतनूर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य साहेबराव गव्हाणे पाटील, विजय पाटील गव्हाणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जळकोट तालुका अध्यक्ष विनोद कांबळे, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसचे लातूर जिल्हा अध्यक्ष संजय शिंदे अतनूरकर, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अविनाश गायकवाड, शिवसेनेचे तथा युवासेनेचे जळकोट तालुकासरचिटणीस मुक्तेश्वर येवरे-पाटील, दलितमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे,
आकाश कदम, आकाश कांबळे, सिद्धार्थ वाघमारे, माजी सरपंच गंगाधर वाघमारे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटराव कोकणे, विश्वजीत कुलकर्णी, ग्रामविकास अधिकारी मैफुज मणियार, भैयाज मुंजेवार, जावेद मुंजेवार, इसुब उदगीरे, नितीन सोमुसे-पाटील, रमेश बोडेवार, विश्वर बोडेवार, संग्राम घुमाडे, बळीराम गायकवाड, महादेव कांबळे, विठ्ठल गायकवाड, प्रकाश गायकवाड, गोरोबा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य राहुल गायकवाड व गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. रिपाईचे तालुकाध्यक्ष विनोद कांबळे यांनी बुद्धवंदना घेतली व आपले मनोगत व्यक्त केले. साहेबराव पाटील, विजय पाटील यांनी पंचशील ध्वज ध्वजारोहण केले.अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन विनोद कांबळे यांनी केले होते. यावेळी दिलीपराव पाटील यांनी खिरदान चा कार्यक्रम ठेवला होता. उपस्थित सर्वांनी खिरीचा स्वाद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp