देवणी / प्रतिनिधी : आज दिनांक 06/02/2024 रोजी श्रीमान गजानन शिंदे साहेब तहसीलदार (तहसील कार्यालय, देवणी.) यांच्यामार्फत मा.श्री. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य), मुंबई ,मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब ,उपमुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य ),मुंबई मा.श्री.अजित दादा पवार साहेब ,उपमुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य ),मुंबई मा.श्री.विलासजी बैस साहेब, राज्यपाल, राज्यभवन ,(महाराष्ट्र राज्य मुंबई) यांना निवेदन देण्यात आले यात निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र विधिमंडळांनी पारित केलेल्या खाजगी विद्यापीठासंदर्भातील नव्या विधेयकामुळे या सर्व विद्यापीठांच्या महाविद्यालयात शिक्षण घेणारे कोणतेही गरीब विद्यार्थी यापुढे फ्रेंडशिप किंवा स्कॉलरशिप सारख्या सवलती पासून वंचित राहणार आहेत गरीबाची शिक्षणाची दारे बंद होणार आहेत सारथी ,महाज्योती, बार्टी यांच्या शैक्षणिक सवलती अडचणीत आले आहेत भरती प्रक्रिया थांबलेली आहे जीवाचे रान करून शिकत आहेत. त्यांचे शिक्षणावर नवी संक्रात/ गडांतर आली आहे. यापुढील दलित,कष्टकरी, शेतकरी,बहुजनांची मुले असे सगळेच या खाजगी विद्यापीठासंदर्भातील नव्या विधेयकामुळे शिक्षण व्यवस्थेतून बाहेर फेकले जाणारे आहेत. व त्यांच्या शिक्षण हक्कावर गदा येणार आहे तरी गरिबी आणि शिक्षण धोरण विरोधी या शासन धोरणाचा जाहीर निषेध जाहीर निषेध नोंदवून सरकारने त्वरित हे विधेयक मागे घेऊन गोरगरिबांच्या शिक्षण घेणाऱ्यांना न्याय द्यावा या संदर्भात श्रमिक हक्क अभियान महाराष्ट्र, अनुभव शिक्षा केंद्र महाराष्ट्र राज्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा अनेक संस्था संघटना च्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp