माजी केंद्रीय कृषिमंत्री ना शरदचंद्र पवार यांच्याकडे अंबुलगा ता निलंगा व नळेगाव ता चाकूर जि लातूर येथील साखर कारखाने चालू करण्याची मनोज कन्नाडे यांची मागणी
लातूर / प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील अंबुलगा तालुका निलंगा येथील डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना व नळेगाव येथील लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना ता चाकूर जि लातूर येथील दोन्ही साखर कारखाने काही कारणने बंदआहेत ही कारखाने चालू करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सचिव मनोज कनाडे यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे मा केंद्रीय कृषिमंत्री ना शरदचंद्र पवार यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे परिसरातील मांजरा पट्ट्यात उसाचे विक्रमी उत्पादन होत आहे चौदा चौदा महीने शेतकरी यांचा ऊस कारखाने घेऊन जाऊन गाळप करीत नसल्याने लातूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे ऊस वेळेत न गेल्याने त्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत आहे काहीही करा आमच्या शेतातील ऊस बाहेर काढा अशी याचना शेतकरी करीत आहेत लातूर जिल्ह्यातील ऊस क्षेत्र वाढल्याने मराठवाडयात विक्रमी गाळप करणारे अंबुलगा व नळेगाव येथील दोन्ही कारखाने कायमस्वरूपी बंद असल्याने शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा होत आहे सीमावर्ती भागात कर्नाटक राज्यातील कारखाने यांना ऊस घेऊन जा पैसे कधीही द्या अशी याचना कारखानदारांना करावी लागत असून यांचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकांचे नेते महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव मा मनोज कनाडे यांनी सदर कारखाने चालू करण्या बाबत मा ना शरदचंद्र पवार यांच्याकडे साकडे घातले आहे —
गिरीधर गायकवाड