कोमटी हा तेलंगाना, दक्षिण विदर्भ, मराठवाडा ह्या प्रदेशात राहात असलेला समाज. ह्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे वाण्याचा, किराणा दुकान, देशी दारुचे दुकान व इतर व्यवसाय. एका मित्राने नांदेडच्या कोमटी समाजाची गोष्ट सांगितली. ह्यातुन आपल्याला काही शिकता आले तर विचार करा.

नांदेडच्या सिडको एरिया मध्ये बौद्ध समाजाचे 500-600 कुटुंब राहतात. ते सालाबादाप्रमाणे बाबासाहेबांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करतात. जयंतीच्या एक-दोन महिन्यापुर्वीपासुनच जयंतीची तय्यारी, वर्गणी गोळा करणे सुरु होते. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधनात्मक भाषणे, मिरवणुक, डीजे ची गाणे, त्यावर नाचणे, वैगरे असे साधारणतः जयंतीचे स्वरुप असते. जयंतीचा बजेट हा काही मंडळांचा हजारांत तर काहींचा लाखांमध्ये असतो.

बौद्ध लोकांची जयंती पाहुन कोमटी लोकांनाही वाटले की आपणही आपल्या समाजातील एखाद्या महापुरुषाची जयंती धुमधडाक्यात साजरी करावी. पण आपल्यात तर बाबासाहेबांसारखा कोणी महापुरुष नाही. मग कोणाची जयंती साजरी करायची हा प्रश्न पडला. मग त्यांच्यातील काही बुद्धिजीवी लोकांनी अभ्यास करुन एका रंगनाथ महाराजांचा शोध लावला. ह्या महाराजांनी, निजामाचे भारतात विलीनीकरणाच्या वेळेस एका स्वातंत्र्य सैनिका सारखे काम केले होते. त्यांनी त्यांच्या समाजातील एका कन्यका परमेश्वरी नावाच्या महाराणीचा इतिहास शोधुन काढला व ठरविले की आपण ह्यांची जयंती करायची. त्यासाठी त्यांनी ह्या त्यांच्या दोन्ही महापुरुषांविषय समाजात जागृती केली. नंतर रंगनाथ महाराजांच्या जयंतीची तारीख ठरविली. त्यासाठी समाजातुन वर्गणी गोळा करायला सुरुवात केली. व्यापारी समाज असल्यामुळे त्यांनी प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीनुसार वर्गणी फिक्स करुन कोणाकडुन दोन हजार, पाच हजार, दहा हजार, तर नौकरीवाल्या लोकांकडुन एक दिवसाचा पगार अशाप्रकारे वर्गणी जमा केली. जयंतीच्या कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्याच समाजातील एका भागवतकाराला आमंत्रित केले. त्या भागवतकाराकडुन सगळ्या देणगीदारांचे नाव जाहिर केले.

सर्वात महत्वाचे म्हणजे असे की, कोमटी समाजातील सुज्ञ लोकांनी असा निर्णय घेतला की आपण रंगनाथ महाराजांची जयंती बौद्ध लोक बाबासाहेबांची जयंती जशी धुमधडाक्यात साजरी करतात, तसे करायचे नाही. जयंतीचा साधा कार्यक्रम घ्यायचा. उगाच डीजे वर पैसे खर्च करायचे नाही. शहरांतील सर्व डीजे वाले हे मराठा समाजाचे. आपला पैसा न मराठ्यांचे डीजे वाजवुन त्यांना श्रीमंत कशाला करायच, हे त्या मागचे गणित ! वर्गणीतुन पहिल्याच वर्षी 15-20 लाख रुपये जमा झाले होते. ठरल्याप्रमाणे रंगनाथ महाराज जयंतीचा छोटासा कार्यक्रम करण्यात आला. वर्गणीतुन जमा झालेल्या पैशाने, त्यांनी सिडकोच्या बाजुची पडीत गावरान जमिन विकत घेतली. पहिल्या वर्षी फक्त पायाभरणीचा कार्यक्रम केला. पुन्हा दुसर्या वर्षी तशाच प्रकारे वर्गणी गोळा केली. 2-3 वर्ष पैसे जमविल्यानंतर त्यांनी त्या जागेवर कन्यका परमेश्वरी आर्य वैश्य बहुउद्देशिय सभागृह बांधले. कोमटी लोक लग्नांमध्ये खुप पैसे खर्च करतात. दुसर्यांच्या मंगल कार्यात लग्न लावुन, दुसर्या समाजांच्या लोकांना श्रीमंत करण्यापेक्षा, हे नविन सभागृह कोमटी लोकांना निशुल्क किंवा अगदी नाममात्र भाडे आकारुन लग्नासाठी देण्यास सुरवात झाली. इतर समाजाच्या लोकांकडुन बाजार दराने पैसे घेवुन, उत्पन्नांचा नवीन स्त्रोत त्यांनी निर्माण केला. त्यासोबतच ह्या सभागृहाच्या आवारात त्यांनी एक 40-50 खोल्यांची लॅाज बांधली. नांदेड एक मोठी बाजारपेठ असल्यामुळे, तिथे दुरदुरुन कोमटी व्यापारी माल घेण्यासाठी नियमित येत असतात. अशा व्यापार्यांची राहान्याची मोफत सोय ह्या लॉज मध्ये करण्यात येऊ लागली. दुसर्या समाजांच्या लोकांना बाजारभावाप्रमाणे भाडे आकारण्यात येऊ लागले. ह्यातुन उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत सुरु झाला.

अशा प्रकारे, समाजातील लोकांच्या गरजा कमी पैशात भागवुन, अधिक उत्पन्न मिळु लागले. पहाता पहाता 3-4 वर्षात 2-3 कोटी रुपये जमा झाले. पुढे त्यांनी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज, तरुणांना नवीन धंदा टाकण्यासाठी कर्ज अशा प्रकारचे उपक्रम सुरु केले. जमा झालेले पैसे त्यांनी आपल्याच समाजाच्या एका पतपेढीमध्ये जमा केले. ही पतपेढी कोमटी लोकांना 4% ने कर्ज देते व इतर समाजाच्या लोकांकडुन 12-15% दराने व्याज वसुल केला जातो. आज नांदेडमध्ये जवळपास सर्व कोआपरेटीव्ह बँकांचे चेअरमेन हे कोमटी लोक आहेत. अशा प्रकारे, जयंतीच्या निमित्त गोळा केलेल्या पैशातुन त्यांनी उत्पन्नाचे साधने तयार करुन, समाजाच्या गरजु लोकांच्या महत्वाच्या गरजा पुर्ण करत करत, सर्वांची आर्थिक परिस्थिती बळकट केली. हे तर झाले आर्थिक बाबतीत. राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी एक वेगळे, इतरांनी धडा घ्यावा, विशेषतः बौद्धांनी असे उदाहरण सेट केले.

महाराष्ट्रातील प्रस्थापित राज्यकर्त्या जातीचे लोक हे इतर जातींमध्ये योजनाबद्धपणे वेगवेगळे गट तट निर्माण करुन त्या समाजांमध्ये अनेक नेते, पक्ष तय्यार करुन त्यांना आपसात भांडायला लावतात. आपआपसात एकमेकांची लक्तरे फाडल्यामुळे, ते समाज राजकिय दृष्टीने कमजोर होतात व त्यांचे लाखो-करोडो मते हे कुचकामी ठरतात. राज्यकर्त्यांच्या ह्या दुष्ट षडयंत्रांचे सर्वात मोठे बळी आहेत बौद्ध व मुस्लिम हे गरीब व शोषित पिडीत समाज.

नांदेडच्या कोमटी लोकांनी एकमताने निर्णय घेतला की आपल्या समाजाचा एकच माणुस ऊभा करायचा मग तो कोणत्याही पक्षाचा असो. पुढच्या वेळेस दुसर्या व्यक्तिला संधी द्यायची. जो कोणी माणुस समाज पुढे करेल त्याला समाजाने आपले एकगठ्ठा मत द्यायचे. हा फार्मुला लावल्यापासुन कोमटी समाजाचे लोक जि.प, पं.स. पासुन तर कार्पोरेटर्स, महापौर व आमदार होऊ लागलेत.

आपण ह्या कोमटी समाजाकडुन काही शिकु शकतो काय ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp