ग्रामीण कवी, कथाकार रमेश मोटे यांना राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्कार जाहीर

लाडझरी (ता परळी वै.) येथील कवि रमेश मोटे यांना जयमल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीड यांचे वतीने साहित्यासाठी देण्यात येणारा यशवंतरत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. अशी घोषणा जयमल्हार सामाजिक प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. राजेंद्र गाडेकर यांनी बीड येथे केली आहे. मान्यवरांच्या हस्ते लवकरच हा पुरस्कार वितरण सोहळा बीड येथे संपन्न होणार आहे. कवि, कथाकार रमेश मोटे हे लाडझरी सारख्या ग्रामीण भागातील असून ते आपल्या साहित्यात ग्रामीण जीवन समर्पक पणे मांडतात. त्यांचे दोन कविता संग्रह प्रकाशित आहेत. बालसाहित्याचे प्रभावी लेखन ते करतात. कथा, कविता, नाटक, एकांकिका इ. साहित्याप्रकारातून ते व्यक्त होतात. एक उत्कृष्ट मृदंग वादक, प्रवचनकार, चित्रकार अशी त्यांची ओळख आहे. राज्यस्तरीय नाटकामधून त्यांनी प्रभावी भूमिका केल्या आहेत. सध्या घाटनांदूर येथे शिवनेरी कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिटयूटचे ते संस्थाचालक आहेत. साहित्यासाठी त्यांना जाहीर झालेल्या या राज्यस्तरीय पुरस्कारा बद्धल त्यांचे लाडझरी ग्रामस्थ, सरपंच शिरीष नाकाडे, ग्रामपंचायत सदस्य, मित्र मंडळी, अंबाजोगाई येथील सर्व साहित्यिक मंडळी, डॉ. मुकुंद राजपंखे, नागनाथ बडे गुरुजी, दत्ताजी वालेकर, सतीश जाधव, डॉ संजय खाडप, संदिप जाधव, पत्रकार गणेश जाधव, माणिकराव ब्रिंगणे, बळीराम पारसे आणि सर्व सांप्रदाय प्रेमी भजनी मंडळींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp