तेलिंगायतहोते_म्हणूनच बाभळगावच्या गढी ने. राजकारण संपवले..!’

१९९५ च्या पराभवानंतर वाणी अर्थात लिंगायत आणि पाण्यावर राजकारण सुरू केलं गेलं. लातूर जिल्हा परिषद असो, की लातूर पालिका, पंचायत समिती असो. डोके वर काढणाऱ्यांचे पाय छाटले जायला लागले. सोयीने काही बगलबच्च्यांचा वापर केला जाऊ लागला. ‘अ’ ला संपवायला ‘ब’ आणि ‘ब’ संपवायला ‘क’ चा वापर कौशल्याने केला गेला.

लिंगायत समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे माजी गृहमंञी श्री शिवराजजी पाटील चाकुरकर व औसा विधानसभेचे माजी आमदार श्री बस्वराज पाटील मूरुमकर दिवंगत चंद्रकांत चौंडा, श्री,संभाजीराव पाटील ‘मालक’, सौ जयश्रीताई पाटील, शिवाप्पा अंकलकोटे, विश्वनाथप्पा कापसे, शिवशरणअप्पा चितकोटे, राजेश्वर नीटूरे, मन्मथप्पा लोखंडे, लक्ष्मीकांत मंठाळे, बाबासाहेब कोरे, ललिता पांढरे, राजाभाऊ राचट्टे, किशोर राजुरे, जितेंद्र स्वामी, उदय चौंडा, गिरीश ब्याळे, महेश आंबेकर. आणखी बरेच. अगदी आताच्या स्मिता खानापुरे. यातले मोठे होऊ पाहणाऱ्या कुणालाही मोठं व्हायच्या आत छोटं केलं गेलं. यातली आजही ‘गढी’शी निष्ठा असलेले दोघे-तिघे वगळता बहुतेकांना ‘१९९५’ च्या ऐतिहासिक पराभवासाठी तत्कालीन ‘मालकमंत्री’ महोदयांनी जबाबदार धरून राजकारणातून संपवले. कारण ‘१९९५’ च्या पराभवाची जखम आज २५ वर्षानंतरही अश्वत्थाम्याच्या भळभळत्या जखम कायम ठसठसते आहे. म्हणूनच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कार्निव्हल’मधल्या काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केलेल्या ‘१९९५’च्या त्या पराभवाच्या साध्या उल्लेखाने काही जणांना लागलेल्या मिरच्या याची आजही साक्ष देतात.

माजी गृंहमंञी श्री शिवराजजी पाटील चाकुरकर हे ही केवळ लिगांयत आहेत म्हणुनच वयाच्या उतारवयात देक्षाच्या सर्वैाचे पदावरती चाकुरकर साहेब विजयी झाले असते तर चाकुरकर प्रंधानमंञी झाले असते त्यावेळी आपली किंमत शुन्य होईल म्हणुन व आपले राजकिय अस्तित्व संपुष्टात येईल यामूळे ,जिल्हाभरातील देशमुख निष्ठावंताना भाजपला मदत करण्याचे फर्मान गढीवरुन सोडण्यात आले होते हे सर्वश्रुत आहे

सहकार तत्वातील नळेगांव येथील जय जवान साखर कारखाना फक्त चाकुरसाहेबांनी आणला म्हणुन त्या कारखान्याला आर्थिक रसद कोणत्याही वित्तय संस्थेकडुन मिळू द्यायची नाही व आपल्याच काही समर्थकाना सोबत घेवून सहकारच्या माध्यमातुन कारखाण्यावरती वर्णी लावुन कारखाना दिवाळखोरीत काढण्याचे व कारखाना बंद करण्याचे पाप देशमुखाच्या गढी ने केले आहे
हे लातुरचा लिगांयत कदापी विसरणार नाही

माजी आ.बस्वराजजी पाटील मूरुमकर हे शिवराजजी पाटील चाकुरकर यांचे मानसपुञ व लिंगायत चेहरा असलेले व औसा विधानसभा मतदार संघातुन दोनदा आमदार झालेले बस्वराज पाटील याचे काॅग्रेस हायकमांडकडे राजकीय वजन हे बाभळगावच्या गढीला सहन तर कस होईल सन 2019 च्या होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीत बस्वराज पाटील मुरुमकर यांचा पराभव होईल अशी रणनिती देशमुखानी आखत श्री नारायण आबा लोखंडे श्री युवराज पाटील ,माजी आमदार श्री दिनकर माने श्रीशेल्य उटगे यांना हाताशी धरुन प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हाताशी धरुन बस्वराज पाटील यांचा पराभव कसा होईल याची पुर्ण खाञी गढीने घेतली व एका चांगल्या लिंगायत आमदाराचा राजकिय बळी देशमुखानी घेतला हे लातुरचे लिंगायत विसरले नाहीत

.
१) #चंद्रकांत_चौंडा :
लातूर पालिकेतला काँग्रेसचा सर्वाधिक आक्रमक वक्ता व अभ्यासु व्यक्तीमत्व. अनेक टर्म गाजवल्या. शहराच्या हितासाठी प्रसंगी स्वपक्षीयांच्या विरोधात आवाज उठवणारा नगरसेवक. सर्व शक्तीमान देशमुखांच्या कारभारावर टीका करण्याची किंमत वेळोवेळी मोजावी लागली. काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली. मात्र, काँग्रेसमधल्या देशमुख समर्थकांनी सगळे ‘वजन’ अपक्ष नगरसेवक मधुकरराव कोकाटे यांच्या पारड्यात टाकून अधिकृत उमेदवार पराभूत केला. कारण चंद्रकांत चौंडा यांनी देशमुखांच्या वर्चस्वाला वेळोवेळी आव्हान दिले होते व त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे चौंडा हे ‘लिंगायत’ कार्यकर्ते होते. ते चाकूरकरांचे समर्थक होते. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची जागा हडप करू पाहणाऱ्या ‘लातूर सिटी फोरम’च्या माध्यमातून रचलेला कुटील डाव चौंडा यांनी हाणून पाडला होता. त्यावेळी चौंडा यांच्यासोबत होते अशोक गोविंदपूरकर. सूर्यप्रकाश धूत, सुरेश त्रिमुखे, कल्पना गांधी. त्यातले आज गोविंदपूरकर काँग्रेससोबत आहेत व बाकीचे संपवले गेले, जे सत्तेपुढे ते कधीच वाकले व विकले गेले नाहीत. विशेषत्वाने चंद्रकांत चौंडा.
शेवटी, चौंडा हे लिंगायत होते…!

२) #संभाजीराव_पाटील ‘मालक’ : स्वच्छ चारित्र्य व आक्रमक चेहरा. शिरूर अनंतपाळ परिसरात ज्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे. लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसने न्याय दिला नाही, म्हणून बंड केले व उपाध्यक्ष पद मिळवले. या संभाजीरावांना न्यायालयात आव्हान देऊन देशमुखांच्या नेतृत्वाखालील चौकडीने पदावरून खाली खेचले. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण अनेक वर्षे चालले, ते केवळ ‘बाल’हट्ट पुरवण्यासाठीच. सत्तेपुढे ते कधीच वाकले व विकले गेले नाहीत.

याच दरम्यान, पक्षादेश डावलून नगराध्यक्ष पद मिळवलेल्या राजेश्वर निटुरे यांना अभय मिळाले. निटुरे यांना अभय देण्यामागे ‘चाकूरकर’ कनेक्शन होते. कसं ते पहा. राजेश्वर निटुरे यांनी भाजपला हाताशी धरून उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गिरीश पाटील यांचा पराभव घडवून आणत ज्या भाजप उमेदवारास विजयी करण्याची जबाबदारी पार पाडली होते, त्यांचे नाव आहे, श्री. सुधीर ‘भोसले’. या निवडणुकीत गिरीश पाटील यांचा लातूरकरांसाठी पराभव आवश्यक होता. कारण गिरीश पाटील हे श्री. चाकूरकरांचे परमस्नेही, बालमित्र, वर्गमित्र श्री. माधवराव पाटील कौळखेडकर ‘अप्पा’ यांचे चिरंजीव आहेत. ( इथं मी जाणीवपूर्वक श्री. माधवराव पाटील उर्फ ‘अप्पा’ यांच्यासाठी परमस्नेही, बालमित्र, वर्गमित्र शब्द वापरतो आहे. श्री. चाकूरकरांचे ‘व्याही’ असे मुद्दाम नमूद करत नाही. )
शेवटी, गिरीश पाटील हे कोण? हे वेगळे नमूद करण्याची गरज नसावी…!

३) #महेश_आंबेकर :
महेश आंबेकर माहीत नाही, असा कोणी निष्ठावंत काँग्रेसमध्ये नसेल. वयाच्या विशीतल्या तरुण महेश यांनी पूर्वपरवानगीने ‘व्हीडी देशमुख’ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपला पसारा विस्तारत नेला. अल्पावधीत ‘VDD’ने मोठा नावलौकिक मिळवला. एके दिवशी बोलावणे आले व ‘VDD’ नाव काढून घेण्याचे आणि हे नाव © झाले असल्याचा आदेशित केले गेले. नावलौकिक मिळवलेल्या संस्थेचे नाव गेल्यानंतर विमनस्क अवस्थेतील महेश परिस्थितीला शरण गेले असले तरी हार न मानता वडील मनोहरराव आंबेकर यांच्या नावातील अद्याक्षरं घेऊन ‘MDA’ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पुन्हा उभारी घेतली. हे महेश तेच, ज्यांच्यावर निवडणूक कुठलीही असो. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सर्व ‘सोय’ करण्याची जबाबदारी महेश यांच्यावर असे. ‘मांजरा’ धाब्यावर पुक्खा झोडला नाही असा कार्यकर्ता अभावानेच सापडेल.
शेवटी, महेश आंबेकर हेही लिंगायतच…!

४) #स्मिता_खानापुरे :
पहिल्या महापौर डॉ. स्मिता खानापुरे यांचं माहेर रेणापूर. कारकीर्द संपताना २०१४ ची विधानसभेची निवडणूक तोंडावर होती व रेणापुरातून डॉ. स्मिता यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारीची चर्चा सुरू झाली. ही चर्चा २०१९ च्या निवडणुकीच्या दृष्टीने ज्यांना धोक्याची वाटली, त्यांनी महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत कट करून प्रभाग बदलून उभे केले. ज्या प्रभागात लिंगायत व ब्राम्हण मतदारांची संख्या निर्णायक आहे, तिथून डॉ. स्मिता खानापुरे यांना उमेदवारी नाकारून अन्य उमेदवार दिले. याचा परिणाम म्हणजे त्यांचा पराभव झाला. डॉ. खानापुरे यांना लिंगायत म्हणूनच संधी दिली गेली होती, हे जे आवर्जून सांगितले जाते, त्यावर त्या लिंगायतच होत्या, म्हणून त्यांचा प्रभाग बदलून पराभूत केलं गेलं, यावर जोर दिला जात नाही. खुप वेळा सांगूनही त्यांचा प्रभाग बदलला व ज्या प्रभागात कोणाचा संपर्क नाही वा निश्चित मतदान नाही, त्या प्रभाग १७ मधून उमेदवारी देण्याचा कट यशस्वी झाला. डॉ. खानापुरे यांचा पराभव हा २०१९ च्या निवडणुकीत आव्हान उभे राहू नये, यासाठीच आवश्यक होता. कारण लातूर ग्रामीण किंवा लातूर शहर मतदार संघातून संभाव्य समस्त ‘देशमुख’ उमेदवारांना लिंगायत समाजातून पर्याय निर्माण होऊ नये, हा हेतु होता. शेवटी, डॉ. स्मिता खानापुरे ह्याही लिंगायतच होत्या, हेही काय वेगळे सांगायलाच हवं.

प्रत्येकाला केवळ लिंगायत आणि चाकूरकर समर्थक म्हणूनच संपवले गेले. १९९१, १९९६, १९९८, १९९९ मध्ये श्री. चाकूरकर यांच्या पराभवासाठी एकापेक्षा एक क्लुप्त्या वापरल्या गेल्या. ( ज्या कट कारस्थानाची जाहीर कबुली दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी टाऊन हॉलच्या मैदानावर दिली. आठवत असेलच सर्वांना… ) सगळ्या कारनाम्यांना एकमेव श्री. शिवराज पाटील चाकूरकर हे पुरून उरले. कारण लातूरचा हुशार मतदार सर्व काही ओळखून होता. याची वेगळी सत्यकथा येईलच. मन्मथप्पा लोखंडे, ललिता पांढरे, राजा राचट्टे, विश्वनाथअप्पा कापसे, याशिवाय, अन्य प्रदीप राठी, विक्रम गोजमगुंडे, बालाजी पांढरे, सुनीता आरळीकर, मुजीबोद्दीन पटेल, कालिमोद्दीन सिद्दीकी, चंद्रकांत मुक्कावार, सूर्यकांत मुक्कावार, मोहन माने, ताजोद्दीन बाबा, नामदेवराव पाटील, नाथसिंह देशमुख व आणखी असे खुप जण आहेत. जे कुणाच्या ना कुणाच्या तरी कट कारस्थानाचे बळी ठरले. काही राजकारणातून बाहेर पडले. कर्तृत्व असूनही काही संपले वा संपवले.
इतिहासाची पानं अनेक काळ्याकुट्ट प्रकरणांनी माखलेली आहेत.

राम धनेगावकर
(एक अस्वस्थ लिंगायत बांधव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp