देवणी / प्रतिनिधी (लक्ष्मण रणदिवे) : तालुक्यातील मौजे अजनी येथील शेतकरी राम माधवराव रामतिर्थे यांची अजनी पाटी जवळ उदगीर-निलंगा रोडलगत पाच एकर शेती आहे. शेतामध्ये जनावरांसाठी मोठा गोठा बांधला आहे,दिनांक 17/9/21 रोजी दिवसभर शेतामध्ये काम करुण संध्याकाळी जनावरे गोठ्यात बांधून जेवण करण्यासाठी घराकडे गेले परंतु शुक्रवारी शेतकरी रामतिर्थे पहाटे शेतात आले असता गोठ्यातील दाराचे कुलुप तोडल्याचे लक्षात येताच गोठ्यामध्ये जाऊण पाहिले आसता गोठ्यातील देवणी जातीची गाय अंदाजे साठ हजार रुपये किमतीची चोरीस गेलेले लक्षात आले.गाय चोरी करणारा गावातीलच कुख्यात गुंड पार्शवभुमी आसलेला विविध पोलीस ठाण्यात विविध स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आसलेला भिम दत्तु अशोकवाड,व त्याची बहिण शालिका दत्तु अशोकवाड यांना शेतकरी रामतिर्थे यांनी गाय चोरीबाद्दल विचारणा केली असता तुझी गाय कुठेही गेली नाही उदगीर येथे पाठविण्यात आली आहे तु पैशाची तडजोड कर असे त्यांनी शेतकरी रामतिर्थे यांना सांगितले असता,त्याच दिवशी शुक्रवारी रात्री अंदाजे दहा वाजता रामतिर्थे यांनी आजनी गावातील पन्नास ते साठ लोक सोबत घेऊन भिम दत्तु अशोकवाड याला पकडुण देवणी पोलिस ठाण्यात आणले आसता त्या ठिकाणी दिवटीवर असलेला ठाणे अमंलदार म्हणाला आज ठाणेदार नाहीत भिम आशोकवाड याला गावाकडं घेऊन जा म्हणाल्याने शेतकरी रामतिर्थे यांनी ठाणे अमंलदारास सांगितले कि गाय चोरी करणारा हाच अरोपी आहे याला येथे पोलीस स्टेशन मध्ये राहु द्या अशी विनवनी केली असता सदरील दिवटीवर असलेला ठाणे अमंलदार म्हणाला कि भिम दत्तु अशोकवाड याला जावु द्या,कोठुणहि याला आम्ही पकडून आणु,तुम्ही उद्या या असा शब्द दिल्यामुळे शेतकरी रामतिर्थे पोलीस ठाण्यातुन निघुण गेले,परत शनिवारी रामतिर्थे यांनी देवणी पोलीसात तक्रार अर्ज घेऊन गेले,रामतिर्थे यांचा तक्रार अर्ज बाजुला ठेवून देवणी पोलीसांनी अजनी गावात सध्या कार्यरत असलेले पोलीस पाटील यांच्याशी मोबाईलवर चर्चा झाल्यानुसार,आपल्या व अजनी गावातील पोलीस पाटील यांच्या मर्जीप्रमाणे व सोयीनुसार अर्ज तयार केले व अनोळखी अरोपी म्हणून व साठ हजार रुपये गायीची किंमत असताना फक्त दहा हजार रुपये किंमत आहे म्हणून fir फाडले असल्याचे वरील सर्व माहिती शेतकरी रामतिर्थे यांनी पोलीस अधिक्षक लातुर यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हणले आहे ? दरम्यान भिम दत्तु अशोकवाड याची पाठराखण करणाऱ्या अजणी गावातील सध्या कार्यरत असलेल्या पोलीस पाटलाची पण सि आय डी मार्फत चौकशी व्हावी,तसेच या पोलीस पाटलाने आपल्या पदाचा दुरउपयोग करून आजपर्यत किती गुन्हेगाराला पोसुन ठेवले आहे व कशामुळे गुन्हेगारांना वाचवित आहे हे सत्य बाहेर यावे अशी मागणी सुजान नागरीकितुन केली जात आहे.