मला दिसत आहे भारताचे भविष्य! अखेरचा सावधान लेख –

तिकडे केंद्र सरकारने one nation one election चे बिगुल वाजवले!
इथे महाराष्ट्रात आरक्षणावर गदारोळ माजवला व हळूच दोन निर्णय घेतले –
१) ६२००० शाळा विकणार!
२) सरकार रिक्त पदे भरण्यासाठी कंत्राटदार नेमून भरती करणार!

हीच मी सतत वर्तवत असलेल्या भयंकर भविष्याची सुरूवात आहे!

भाजपा One nation one election ने सर्व राज्ये व केंद्रात ईवीएमनेच निवडणूक जिंकणार आणि सरकारे आणणार!

शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन काळे धन वाल्यांच्या परदेशात रजिस्टर झालेल्या २७००० कंपन्यांच्या नावे देश खरेदी करणार!
भारतात एक इंच ही जमीन शिल्लक रहात नाही!
विरोधात आपण रस्त्यावर उतरले की अग्नीवीर नामक सरकारी दहशतवादी पथके गोळ्या घालून आंदोलन मोडून काढतील!
नंतर चार वर्षे पूर्ण झाली की हे अग्नीवीर २७००० कंपन्यांच्या गेट्सवर उभे करतील!

सर्व शाळा खाजगी विनाअनुदानित! त्यांची फी भरणे सामान्य माणसाला ही शक्य नाही!

तरीही जे शिकतील ते सर्व कंत्राटी पद्धतीने वेठबिगार व गुलाम म्हणून जगतील!

नंतर सर्व दवाखाने रुग्णालये खाजगी होतील! तिथे सामान्य माणसाला उपचार घेणे अशक्य होईल!

धर्म निरपेक्षता व समाजवाद हे शब्द उद्देशिकेतूनच काढले आहेत! त्यामुळे संविधान संपवून मनूसंविधानाची अंमलबजावणी केली जाईल!

शेतकऱ्यांचे भवितव्य –
सर्व शेती यंत्राने होईल! त्यामुळे फक्त ५-१०% लोकांना काम मिळेल! ते ही जे लोक वेठबिगारी करायला तयार होतील तेच गेटच्या आत येऊ शकतील! (मी हे आसामच्या चहा मळ्यात जाऊन पाहिले आहे! जंगले ताब्यात घेऊन अक्षरशः सर्व आदिवासी लोकांना तिथे पत्र्याच्या शेडमध्ये ठेवले आहे! संडास बाथरुम ही नाहीत! स्त्रिया आजही विहिरी वर पाणी काढून आंघोळ करतात!)

९०% शेतकरी कंपन्यांच्या गेट्सवर उभे राहतील! पोटाला काही तरी द्या! पडेल ते काम करू!
स्मार्ट स्त्रिया फक्त गेटच्या आत घेतील! बलात्काराची ही तक्रार करता येणार नाही हे मान्य केले तरच काम!

भारत देश असा असेल –
सर्व शेटजी भटजी लाटजी चाटजी स्मार्ट सिटीत जातील!
सरकार, अधिकारी, मिलिटरी पोलिस व कंत्राटदार कंपन्या!

२७००० परदेशात रजिस्टर झालेल्या कंपन्यांची कुंपणे सर्व रस्त्यांवर दोन्ही बाजूला! मधेच गेट्स व त्यांचे मॉल! (तिथे भाजी पेंडी १०० रू. ला तर लिंबू १० रु ला असू शकतो!)

सर्व गावांमध्ये व रस्त्यावर मरतुकडे भिकारी आणि गवत व झाडांची पाने फुले मिळवण्यासाठी भांडणारे लोक!

मला हे सर्व कसे दिसले?
●१) LARR BILL 2014/RFCTLARR BILL 2015!
(हा कायदा बाजूला ठेवण्यासाठी कारणीभूत झाले होते छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेचे माध्यमातून २०१७ चे आषाढी वारीत केलेले प्रबोधन! पण नंतर त्यांनीच त्यापेक्षा भयंकर तीन काळे कायदे आणले होते! ते ही मागे घ्यावे लागल्याने हा कायदा परत आणणार हे नक्की?)
●२) अखलख व गोरखपूर बालके हत्याकांड! ते मणिपूर बलात्कारकांड!
●३) राफेल कांड, जीएसटी लूट, डिझेल पेट्रोल लूट कांड.
●४) नोटाबंदी लूट कांड.
●५) करोना लूट व हत्याकांड!
●६) करोनानंतरची सर्व कारस्थाने व खोट्या प्रचाराने लोकांची दिशाभूल!
या सर्वांची एकत्रित संगती लावून विचार करता हे भविष्य दिसले!
तुम्ही म्हणाल या सरकारने चांगले काहीच केले नाही का?
होय. रेल्वे, रस्ते केले ना! आता भविष्यात ज्या २७००० कंपन्यांच्या नावे देश खरेदी करणार आहेत त्यांच्या सोयीसाठी! सेवा निवृत्त झाल्यावर घेतलेली कार! दहाच वर्षांत मला कार परवडेना! आणखी दहा वर्षांत माझी हालत काय होईल?

🙏सबब सर्वांना विनंती – अजूनही किमान १०० दिवस शिल्लक आहेत!
शिवरायांनी जशा मोहिमा आखून स्वराज्य निर्माण केले त्याचप्रमाणे आपण सर्व मतभेद बाजूला ठेवून, संघटित होऊन मजबूत बनले पाहिजेच! आधी ईवीएम हटाओ देश बचाओ आंदोलन यशस्वी केले पाहिजे! मग आपलेच उमेदवार उभे करून कायदेमंडळात पाठविले पाहिजेत!
आपण आपल्या भविष्याचा विचार मेंदू वापरून केला तरच बाकी सर्व ईश्वर पाहून घेईल व मदत करेल!
जय ज्योती जय क्रांती, जय बसवा, जय भीम 🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp