बरेच शेतकरी फेब्रुवारी महिन्यात केळी लागवडीकडे वळतात किंवा करीत असल्याचं निर्देशनस येत आहे. त्याला कारण असे की गेल्या पाच, सात वर्षांपासून फेब्रुवारीत लागवड केलेल्या केळीला बाजारपेठेत चांगला भाव मिळत असून शेतकऱ्याला त्याचा खूप मोठा फायदा होत आहे. परंतु एक Cucumber mosaic virus नावाचा विषाणूजन्य रोग हा नेमका उन्हाळी लागवडीमध्ये जास्त प्रमाणावर होतो. हा रोग होण्यास कारणीभूत असलेले विषाणू हे जवळ जवळ दोन हजार प्रकारच्या Host plants वर उपजत असतात आणि त्यांना पोषक हवामान ज्यावेळेस मिळते त्यावेळेस झपाट्याने त्याची वाढ होते आणि नेमक्या ह्या उन्हाळ्यात लागवडीमध्ये तापमान वाढीचा वाईट परिणाम केळी पिकावर होत आलेला आहे. परंतु काही शेतकरी बांधव असे आहेत की ह्या तापमान वाढीचा जो परिणाम आहे त्याला केळी पिकावर कोणताही परिणाम होणार नाही यासाठी केळीच्या दोन ओळींमध्ये आंतरपीक म्हणून तीळ पिकाची निवड करीत आहेत. तीळ पिकास पकवतेस 90 दिवस जास्तीत जास्त लागतात आणि ह्या 90 दिवसांमध्ये तीळ पिकाची वाढ साधारणता एकशे वीस सेंटीमीटर पर्यंत होत असते आणि तीळ पिकाचे पान ही भाल्याच्या आकाराची किंवा भेंडीच्या आकाराची असल्याकारणाने त्या पिकाची सावली छान प्रकारे जमिनीवर पडत असते आणि नेमका या सावलीचा फायदा त्यामध्ये लागवड केलेल्या केळी पिकास उन्हाळ्या हंगामामध्ये होतो आणि केळीच्या पिकाच संरक्षण या सावलीमुळे होतं आणि त्या ठिकाणच सूक्ष्म तापमान तयार होऊन उष्ण तापमान पासून केळीचं संरक्षण होण्यास मदत होते. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तीळ पिकाच्या मुळाजवळ एक विशिष्ट प्रकारचं विषारी वायू तयार होतो आणि ह्या वायूमुळे केळीच्या मुळावरील वाढलेले पिकासाठी घातक असलेले सूत्र कृमी नैसर्गिकरित्या मरतात आणि पर्यायाने सी एम व्ही सारख्या रोगास प्रतिबंध तयार होतो.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीळ पिकाला कोणतेही जंगली जनावर खात नाही आणि त्यामुळे संपूर्ण क्षेत्राची राखण जंगली जनावरांपासून तीळ पीक करीत असत हा एक लक्षात घेण्यासारखा विषय आहे. तीळ पीक एक प्रकारचं संरक्षण कवच मुख्य पिकासाठी करीत असत असं म्हणायला हरकत नाही. पिकास लागवडीपासून ते काढणीपर्यंत 90 दिवस लागतात आणि नेमकं ह्या 90 दिवसात उन्हाळ्यामध्ये तापमान वाढलेल असत आणि त्या तापमान वाढीचा वाईट परिणाम केळीच्या पिकावर होत असतो. केंद्र शासन या वर्षापासून तेलबिया पिकांसाठी विशेष मोहीम राबवित असून शासनाच्या दरामध्ये शासकीय पातळीवरती तेल बिया पिकांची खरेदी केंद्र उघडून MSP च्या भावामध्ये शेतकऱ्यांच उत्पादित माल घेण्यासाठी त्यांनी विविध योजना आणलेले आहेत कारण तेलबिया पिकामध्ये भारत हा मागे पडत चाललेला असून बाहेरच्या देशातून त्यांना तेलबिया पिके आयात करावी लागत आहेत. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मोजावे लागत आहे. देशाला तेलबिया पिकांमध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी शेतकरी राजालाच पुढे यावं लागणार आहे आणि अशी विविध प्रयोग घेऊन आपल्या देशाला समृद्ध करता येईल.
.. . . . .. प्राध्यापक डॉ.सुमेरसिंग राजपूत, तीळ पैदासकार, तेलबिया संशोधन केंद्र जळगाव.