मानधन नाही मिळाल्यास आमरण उपोषण करणार — रामदास कदम
नमो महा रोजगार मेळावा निमित्त साक्षर भारत प्रेरक प्रेरिका संघटनेने खासदार आमदार मंत्र्यांना दिले निवेदन
देवणी प्रतिनिधी — लक्ष्मण रणदिवे
जिल्हा परिषद गार्डन लातूर येथे दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी ठीक १ वाजता बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यात आली तसेच मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर शिक्षणाधिकारी योजना लातूरच्या सौ अनिता काळे यांच्या मार्फत मा.शिक्षण संचालक साहेबांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.मागण्या खालील प्रमाणे आहेत.१ थकित मानधन देणे.
२ नव भारत साक्षरता योजनेत सामावून घेणे.३ अंशकालीन दर्जा देणे.वरील मागण्याचे निवेदन देण्यात आले.आपल्या मागण्या मान्य नाही झाल्यास महाराष्ट्र राज्य साक्षर भारत प्रेरक व प्रेरिका सघाचे, भगवानराव देशमुख, दत्ता देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संचालक कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण करण्याचे ठरले आहे या बैठकीला लातूर जिल्ह्यातील आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा.भुंगज अर्जुने,मा.रामदास कदम अध्यक्ष ता. जळकोट,लक्ष्मण रणदिवे अध्यक्ष ता.देवणी,प्रकाश घोरपडे अध्यक्ष ता.निलंगा, सलीम बिरादार जळकोट उपाध्यक्ष, दशरथ वाघमारे जळकोट,नागनाथ गायकवाड,सुनील पांढरे,लातूर, धनराज देडे, प्रल्हाद गुबनर, महानंदा तादलापुरे, छाया गायकवाड, शोभा बिरादार, पद्मीन गायकवाड, त्रिशला कांबळे, कावेरी नितंगे, मंदा आदमाने, वैशाली शिंदे, रंजना पोलकर, काशिनाथ मुगे,माधव काबळे, रवि गायकवाड, आदीची उपस्थिती होती