देवणी / प्रतिनिधी :

सन 2023-24 चा गळीत हंगाम तोंडावर आला असून केंद्र सरकारने या वर्षाच्या गळीत हंगामासाठी ऊसाची FRP 3150 रू जाहिर केली आहे देशातील इतर राज्यातील व महाराष्ट्रातील काही कारखानदारानी हंगाम सुरु होण्यापूर्वी पहिली उचल जाहिर केली आहे,

यावर्षी ऊसाचे क्षेत्र कमी आसुन परतीचा पाऊस पडला नसल्याने ऊसाची वाढ झाली नाही त्यामुळे कारखानदाराना ऊसाची कमतरता भासनार आहे, परिनामी गळीत हंगाम ज्यास्त काळ चलनार नाही साखर,इथेनॉल,चे दर यावर्षी केंद्र सरकारने जाहीर केलेली FRP 3150 रु लक्षात घेता या वर्षी मांजरा परिवाराकडुन उसाला किमान पहिली उचल 3500 रू मिळने शेतकर्याला अपेक्षीत आहे त्याप्रमाणे पहिली उचल जाहिर करावी,

कारण मांजरा परिवारातील कारखाने हे ऊसाचा प्रोग्राम हे किमान चौदा म्हीण्याच्या नंतरच लागतो त्यामुळे तीन वर्षात शेतकर्‍यांचा दोनदाच ऊस तोड होतो येवढ्या उशिरा तोड होऊनही एकाही कारखान्याची रिकव्हरी वाढताना दिसत नाही रिकव्हरी प्रमाणे भाव ठरायला लागल्यापासून सर्वच कारखाण्यची रिकव्हरी घसरायला का लागली हा प्रश्न ऊस उत्पादकांना पडायला लागला आहे,

तसेच स्वताच्या ऊसाचे वजन कुठल्याही खाजगी वजन काट्यावर वजन करण्याचा अधिकार शेतकर्यानां आहे पण बाहेर वजन करुन आणलेली ऊसाची गाडी कारखाण्यात घेतली जात नाही या बद्दल मांजरा परिवाराने आपली भूमिकाही स्पष्ट करावी,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp