शालुकाआई प्रतिष्ठान शिरूर च्या वतीने

कमलनगर येथे शेतकरी मेळावा संपन्न

कमलनगर / प्रतिनिधी
कमलनगर येथे नैशनल प्रोग्राम फौर औरगैनिक प्रोडक्शन च्या माध्यमातून काळी आई वाचवा आभियानाचा एक भाग म्हणून शालुकाआई प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक ९ जून रोजी नागोबा मंदिर सभागृहात सकाळी ९.३० वा. शेंद्रीय शेती काळाची गरज या विषयावर शेतकरी मेळावा घेण्यात आला.
या शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उदगीर मार्केट कमिटीचे माजी सभापती गोविंदराव भोपणीकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून इरशाद शेख यांनी मार्गदर्शन केले. या वेळी शेतकरी प्रतिनिधी म्हणून बालूर येथील प्रयोगशील शेतकरी विठ्ठल पाटील यांनी आनूभव व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माधवराव चांगुने उपसरपंच कमलनगर, मारुती आळंदे सरपंच होळसमुद्रा, महेश बावगे सदस्य सावळी, नागनाथ गड्डीमे, नानेश्वर सूर्यवंशी, दिलीपराव हुरुसणाळे गंगाधर पाटील, अशोक शेरे आदींची उपस्थिती होती.
आध्यक्षीय भाषणात काळी आई वाचवा आभियानाचा एक भाग म्हणून शेंद्रीय शेती कडे शेतकऱ्यांनी वळल्यास शेतकऱ्याचे व जमीनीचे आरोग्य चांगले राहिल आसे सांगितले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक संस्थेचे सचिव बालाजी टाळीकोटे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाकीर बागवान, गरिबे विश्वनाथ, फरीद शेख,रज्जाक शेख,श्रीधर चांगुणे,बालाजी जाधव आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp