देवणी / प्रतिनिधी : देवणी तालुक्यातील मौजे विळेगाव गावात मातंग सामाज वस्तीला गेली चार (४)महिने झाली पाणी पुरवठा पूर्णतः बंद आहे,या अनुषंगाने मातंग अस्मिता संघर्ष सेना (मास )च्या वतीने ग्रामपंचायत सरपंच/ग्रामसेवक तसेच गटविकास अधिकारी व सभापती साहेब देवणी या सर्वांना निवेदन देण्यात आले होते,निवेदनाच्या माध्यमातून मा.सरपंच/मा.ग्रामसेवक/मा.गटविकास अधिकारी व तसेच मा.सभापती साहेब यांनी चौकशी केली असता पाणी पुरवठ्यासाठी विदयुत विज पुरवठा बंद आहे असे निदर्शनाश आले,या विषया अनुषंगाने मा.ग्रामसेवका साहेब,मा.गटविकास अधिकारी साहेब मा.सभापती साहेब यांनी महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण(M S E B)च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विनंतीपूर्वक पत्र व्यवहार केले असता,कोणत्याही प्रकारचे सहकार्य व प्रतिक्रिया भेटत नाही,एक जबाबदार कर्तव्यानिष्ठ अधिकारी आपल्या कर्तव्यापासून दूर जात आहे,ज्या मुळे मातंग समाजाला पाणी मिळत नाही,विशेष बाब म्हणजे त्या अधिकऱ्यांना,पाणी पुरवठा हे फक्त मातंग समाजाचा बंद आहे हे माहित असून सुद्धा M S E B चे अधिकारी जाणीवपूर्वक मातंग समाजाला मूलभूत गरजा पासून वंचित ठेवण्याचं काम करीत आहे, जातीय मानसिकतेच्या जातीयद्वेष भावनेच्या चष्म्यातून समाजाकडे पाहणाऱ्या गैरजबाबदार मगरूर अधिकाऱ्यांचा जाहीर त्रिव निषेध करत, अश्या अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी, मातंग अस्मिता संघर्ष सेने (मास)च्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी उप कार्यकारी अभियंता कटनधवन साहेब यांनी विळेगाव व संघटनेच्या पदाधिकारी यांना सविस्तर माहिती देण्यात आले की मातंग समाजातील वस्तित गेले चार महिन्यापासून लाईट नसल्यामुळे होणाऱ्या अडचणी लवकरात लवकर सोडवण्यात येईल आसे सांगितले या वेळी मासचे जिल्हाध्यक्ष सत्यवान कांबळे, देवणी तालुकाध्यक्ष विकास गायकवाड, देवणी शहराध्यक्ष जितेश रणदिवे , कोडल कांबळे, लक्ष्मण रणदिवे, ग्रामसेवक व मांतग बांधव या वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp