सन १९६९ मध्ये अमेरिकेने ‘अपोलो-११’ मधून चंद्रावर मानव पाठविल्याचा दावा केला तो कितपत खरा असेल याबाबत थोडेसे मंथन व्हावे आणि सामान्य जनमानसही याबाबत सजग व्हावा म्हणून हा प्रपंच. रशिया, चीन,जपान यासह अनेक राष्ट्रांना यावर पूर्वीपासूनच विश्वास नाही. अमेरिकेची २०% जनता देखील यावर विश्वास ठेवत नाही. रशियाने अमेरिकेच्या चार वर्ष अगोदर चंद्रावर पहिले यान पाठविले होते. परंतु अमेरिकेला त्याकाळी तसे करणे जमले नव्हते.त्याकाळी अमेरिकेच्या ‘नासा’या संस्थेने जगाला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न केला. अख्खा भारत याला बळी पडला आणि अभ्यासक्रमातून चंद्रावर माणूस गेल्याचे पाठ शाळेमधून शिकविले जाऊ लागले. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर रशिया व अमेरिका ही दोन राष्ट्रे जागतिक महासत्ता म्हणून उदयास आली. रशिया पेक्षा आपण कमी नसून त्याच्यापेक्षाही प्रगत आहोत हे भासविण्यासाठी अमेरिकेने अपोलो ११ ची बनवाबनवी केली. अमेरिकेमध्ये ‘एरीया ५१’ नावाचे कठोर प्रतिबंधित क्षेत्र आहे. आज पर्यंत येते कोणीही जाऊ शकला नाही.हा वाळवंटी भाग चंद्राच्या पृष्ठभागाशी साम्य पावणारा आहे.< त्या जागी अमेरिकेने चंद्रावर माणूस पाठविण्याची कल्पित शूटिंग करून ती चित्रफित साऱ्या जगाला दाखविली. ह्या घटनेचा जगप्रसिद्ध ‘फॉक्स टीव्ही’ ने “कनस्पायरसी थेरी: डीड वुई लँड ऑन द मून ? ” द्वारे भांडाफोड केला.’ न्याश एंटरटेनमेंट’चे कार्यकारी निर्माता ब्रुश-नेश आणि दिग्दर्शक जॉन मोफेट यांनी सन २००१ मध्ये अमेरिकेच्या चित्रफितीचे सुक्ष्म निरीक्षण करून अमेरिकेच्या बनवाबनवीचा पंचनामा जगासमोर मांडला.
बिल केसिंग (मून हाँक्स इनवेस्टीगेटर )यांनी या घटनेचे यथार्थ असे जे स्पष्टीकरण दिले ते जाणून घेतले असता कोणाचीही मती गुंग होईल. अमेरिकेचे अपोलो ११ हे यान चंद्रावर गेलेच नाही. त्यामुळे चंद्रावर मानव जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याविषयी अनेक प्रश्न जगासमोर मांडले गेले ते असे…
अमेरिकेने पृथ्वीच्या वातावरणात चंद्रावर यान उतरविण्याचे अनेक वेळा प्रात्यक्षिक केले. परंतु प्रत्येक वेळी ते यान क्रॅश झाले. मग चंद्रावरील अज्ञात अशा परिस्थितीत यान चंद्रावर यशस्वीपणे कसे काय उत्तरले? चंद्रावर पहिले पाऊल ठेवले याचे छायाचित्र अमेरिकेने प्रसिद्ध केले. परंतु यान उतरत असताना सुमारे १०,००० पौंड प्रेशरने हवा भूपृष्ठावर सोडली जाते त्यामुळे त्या ठिकाणची व आजूबाजूची धूळ उडून त्या ठिकाणचा खडक उघडा पडतो. मग खडकावर पावलाचे ठसे कसे उमटतील? परंतु मातीवर पावलाचे ठसे दाखविले आहेत ते धांदात खोटे आहे.यानाच्या हवेने उडालेली धूळ यानाच्या फुट पॅडवर पडायला हवी पण त्या फूट पॅडवर जराही धूर दिसत नाही. अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या फिल्ममध्ये चंद्रावर मानव फिरत असताना अंतरिक्षामध्ये कोठेही चांदण्या दिसत नाहीत. अमेरिकेच्या अंतराळवीरांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज चंद्रावर रोवल्याची फिल्म दाखवली. त्या फिल्म मध्ये तो राष्ट्रध्वज वाऱ्यावर फडकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.चंद्रावर तर वातावरणच नाही मग झेंडा फडकलाच कसा ?चंद्रावर प्रकाशाचा एकमेव स्रोत सूर्य आहे. त्यामुळे त्या दोन्ही अमेरिकन अंतराळवीरांच्या सावल्या ह्या एकाच दिशेने पडायला पाहिजेत परंतु त्या दोघांच्या सावल्या एकमेकांना क्रॉस करताना फिल्म मध्ये स्पष्ट दिसत आहेत. याचा अर्थ अमेरिकेतील एरिया-५१ या जागी बनावट शूटिंग प्रसंगी मल्टी लाईट लावल्यामुळे त्या सावल्या एका दिशेने पडल्या नाहीत. ब्लास्ट क्रेटर झाल्याशिवाय एखादे यान उड्डाण करूच शकत नाही. परंतु चांद्रमोहीम आटोपून पृथ्वीवर येणाऱ्या शक्तिशाली रॉकेट इंजिन असलेल्या यानाचे ब्लास्ट क्रेटर झाल्याचे त्यामध्ये आढळून येत नाही.अगदी सहजपणे चंद्रावरून उडून ते यान पृथ्वीवर आलेच कसे ? वस्तुस्थिती अशी की अमेरिकेचे यान पृथ्वीच्या वातावरणात आठ दिवस फिरत राहिले. त्यानंतर ते महासागरात उतरले ते कधीही चंद्रावर गेलेले नाही.
जगामध्ये हबल दुर्बीण इतकी प्रगत आहे की पृथ्वीवरून अवकाशातील एखाद्या ठिकाणचा वेध घेतला असता प्रत्येक भाग स्पष्ट दिसतो.परंतु हबल दुर्बिणीतून आजही चंद्रावरील अमेरिकेचा तो राष्ट्रध्वज, त्या यानाचे अवशेष किंवा पादुकांचे ठसे आजही दिसून येत नाहीत. चंद्रावर वातावरण नसल्याने या वस्तू आहेत त्याच ठिकाणी जशास तशा असायला पाहिजेत. आज घडीला अब्जावधी प्रकाशवर्षे दूर असलेल्या अंतरिक्षातील ‘ब्लॅक होल’ दिसू शकते परंतु चंद्रावर अमेरिकेने सोडलेल्या वस्तू मात्र< दिसून येत नाहीत,हे मोठे कोडेच वाटते!आज जगामध्ये विज्ञान कल्पनेच्या बाहेर प्रगत झालेले आहे. जर ५२ वर्षापूर्वी मानव चंद्रावर जाऊ शकला असेल तर मग आज घडीला तो का जाऊ शकत नाही? आज पर्यंत तर केसरी टूर्स, सचिन टूर्स सारख्या चंद्रावरच्या सफरी सुरू व्हायला पाहिजे होत्या. तशा का झाल्या नाहीत? अमेरिकाच काय पण जगातील कोणत्याही देशाने चंद्रावर आजपर्यंत पाऊल ठेवलेले नाही हे विशेष! अमेरिकन नासाच्या बनवाबनवीबद्दल ज्या ज्या शास्त्रज्ञांनी विद्रोह केला, बंड केले, त्यापैकी एस्ट्रोनॉट ग्रीस हे एक होते, त्यांचा गूढरित्या अपघात झाला. मिसेस ग्रीसम व त्यांचा मुलगा यांना तो अपघात नसून घात असल्याचे जगाला अनेक वेळा ओरडून सांगितले. एस्ट्रोनॉट ग्रीसमने नासाच्या बनवाबनवी विरुद्ध विद्रोह केल्यामुळेच नासाने त्याचा काटा काढला असावा. इतर देशातील शास्त्रज्ञांना फूस लावून प्रात्यक्षिक करायची नासाची सवय नवीन नाही.
अशा प्रात्यक्षिकामुळेच कल्पना चावलाचाही नाहक बळी गेला, त्यास अमेरिकाच जबाबदार आहे. महत्त्वाची बाब अशी की तथाकथित यान चंद्रावर उतरत असताना अंतराळ वीरांनी “आम्ही चंद्रावर पहिले पाऊल ठेवतोय ” हा संदेश पृथ्वीवर नासाला पाठविला. तो संदेश अगदी स्पष्टपणे ऐकू येतो परंतु त्या यानाचा आवाज मात्र त्यात ऐकू येत नाही हे फार मोठे आश्चर्य आहे. त्या यानाचा आवाज ११४ डी. बी. लेवलचा अतिशय कर्ण कर्कश असूनही तो ऐकू आला नाही किंवा येत नाही, हे ही फार मोठे कोडेच आहे.
सूर्यापासून येणारे ‘अल्ट्रा व्हायोलेंट रेज ‘ हे अतिशय घातक असतात. चंद्रावर वातावरण नाही, त्यामुळे तेथे ‘ओझोन वायूचा संरक्षक थर ‘असण्याचा प्रश्नच येत नाही. मग सूर्यकिरणांच्या रेडिएशन पासून ते अंतराळवीर जिवंत कसे काय राहू शकले ?त्यांचे पोशाख ऍनॅलिसिस करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये त्यांचे ते पोशाख सामान्य धाग्यांचे बनलेले असल्याचे आढळून आले आणि ते चंद्रावर टिकूच शकत नसल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. चंद्रावर गेलेले अंतराळवीर स्वतः सावलीत दिसतात मात्र त्यांचे फोटो अंधुक येण्याऐवजी अगदीच प्रखर दिसतात. अंधाराच्या दिशेने असलेल्या यानाच्या बोर्डावर ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका ‘ हे नाव मात्र चमकताना दिसत आहे, हे काय गौड बंगाल असेल? अंतराळवीरांच्या छातीला कॅमेरा फिट केल्याचे चित्रात दिसत आहे.त्यामुळे अशा परिस्थितीत एखादे चित्र कॅमेऱ्याच्या लेन्सवर आहे की नाही ?हे कळूच शकत नाही.परंतु प्रत्येक छायाचित्र मात्र स्पष्ट,बरोबर आणि रेखीव दिसते, ते कसे ? नासा ज्या ज्या वेळी संशोधनाचे फोटो घेते त्या त्या वेळी त्या फोटोवर क्रॉस मार्क करते. त्यांनी दाखविलेल्या चंद्रावरील फोटो वर सुद्धा क्रॉस मार्क आहेत. ते मार्क्स फोटोवर कसे ? असे नासाला विचारले असता नासाने सांगितले की,. ” पृथ्वीवर आणल्यानंतर क्रॉस मार्क केलेले आहेत” परंतु खेदाची बाब अशी की ते क्रॉस मार्क राष्ट्रध्वजाच्या पलीकडे अर्धे झाकलेले आणि अंतराळवीरांच्या डोक्यांच्या पलीकडून अर्धे लुप्त झालेले दिसत आहेत.असे प्रकार अनेक फोटोवर आहेत याचा अर्थ असा की नासाने ते फोटो पृथ्वीवर काढलेले आहेत. रशियाने किंवा अन्य कोणत्याही देशाने आजपर्यंत चंद्रावर मानव पाठविला नाही. तेथे मानव कधीच जाऊ शकत नाही. कारण तेथील परिस्थिती घातक आहे असे रशियाचे मत आहे. निर्माता’पॉल लेझरस’ यांनी त्यांच्या मंगळावरील स्वारी या विषयावरील ‘कॅप्रिकॉर्न वन’ नावाच्या हॉलीवूड चित्रपटासाठी चांद्र पृष्ठभागासारखा सेट तयार केला होता.’अपोलो-११’ चे फुटेज आणि कॅप्रिकॉर्न वन यांचे फुटेज अत्यंत मिळते जुळते आहे त्यांना विचारले असता ते म्हणाले की, “अमेरिकेच्या चांद्रयान मोहिमेची शूटिंग ही पृथ्वीवरच केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.”अमेरिकेमधील प्रतिबंधित ‘एरीया-५१’ह्या भागाची उपग्रहाद्वारे छायाचित्र घेतली तेव्हा त्या भागाची छायाचित्रे चंद्रावरील पृष्ठभागाशी हुबेहूब जुळतात. जगात शेकडो शास्त्रज्ञांना मानव चंद्रावर जाऊन परत येऊ शकतो का असे विचारले असता त्यांनी,”नाही,अजिबात नाही” असेच उत्तर दिले. त्यापैकी ज्यांनी शक्यता वर्तविली ती केवळ ०.००१७ % इतकीच असल्याचे सांगितले.
‘ डेविस एस. परसी’ हे रॉयल फोटोग्राफिक बुकटी असून त्यांनी नासाच्या फोटोतील दोष सांगितले की बार्ट सिड्रल’ हे इन्वेस्टीगेटीव जर्नालिस्ट असून त्यांनी सांगितले की, “नासाने मुद्दाम काही चित्रे अस्पष्ट केलेली आहेत.” जेव्हा अंतराळवीर चंद्रावर उड्या मारत चालत होते तेव्हा त्यांची गती ‘२× वेग’या सूत्राने प्रात्यक्षिक करून तपासले असता ते उड्या मारत चालत नव्हते तर ते पळत होते हे उघड झाले. त्यात काटछाट म्हणजे फिल्म फॉर्जरी करून उड्या मारताना दाखविले आहे. ब्रायन डी. लिअरी व ब्रायन वेल्थ हे नासाचे अंतराळवीर उघडउघड खोटे स्पष्टीकरण देताना दिसून येतात. डॉ. हावर्ड मेक कर्डी हे अमेरिकन विद्यापीठात स्पेस हिस्टोरीयन असून त्यांनी अमेरिका-रशिया यांच्यातील स्पेस प्रोग्रामिंगची स्पर्धा दाखवून दिली आहे. ह्या सर्व मंथनातून अमेरिकन नासाच्या कटकारस्थानाचा प्रत्यय येतो. अमेरिकेचे ‘अपोलो ११’ हे यान चंद्रावर कधीच गेले नव्हते. आणि कोणताही अमेरिकन मानव अंतराळवीर म्हणून चंद्रावर कधीच गेला नव्हता.अमेरिकेने जगाला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न केला.आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केली असूनही उद्यापर्यंत चंद्रावर मानव जाऊ शकला नाही. मग ५२ वर्षांपूर्वी कसा काय जाऊ शकला ? शालेय अभ्यासक्रमात आता ‘चंद्रावरील स्वारी’ या पाठा ऐवजी “चंद्रावर माणूस गेलाच नाही: अमेरिकेने जगाला मूर्ख बनविले.” हा पाठ समाविष्ट केल्यास अजिबात नवल वाटू नये.

डॉ. रमेश विवेकी, लातूर भ्र.ध्व.७७२१८५५९७९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp