
येनगेवाडी येथे मातंग समाजाची स्मशानभूमी नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला मृतदेह जाळण्यात आले
संतप्त समाज बांधवांनी अंत्यविधी केले रस्त्यावरच देवणीच्या तहसीलदारांना ब्रह्मध्वनी संपर्क केला असता संपर्काच्या बाहेर
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द ग्रुप ग्रामपंचायत येनगेवाडी येथील मातंग समाजाची महिला सीनाबाई गुणवंतराव रणदिवे यांचा मृत्यू दिनांक१७/११/२०२४ रोजी झाले होते मातंग समाजाच्या स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधी कुठे करायचा मातंग समाजाला प्रश्न पडला या स्मशानभूमी संदर्भात जागाची मागणीसाठी देवणी खुर्द ग्रामपंचायतने तहसीलकडे वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा जागा उपलब्ध करून दिले नाही म्हणून मातंग समाजातील लोकांचे प्रेत रस्त्यावर जाळण्याचे ठरवले परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बाजूला जाळण्यात ठरवले होते त्या ठिकाणी शेतकरी व मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांच्या सोबत वाद निर्माण झाला होता त्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे, विठ्ठल शिंगडे उपसरपंच,दिलीप सूर्यवंशी, दयानंद रणदिवे लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्याची समजूत काढून यापुढे आम्ही मातंग समाजाच्यातील मृत्यू पावल्यास या ठिकाणी जाणार नाही असे सांगून वाद मिटवले यावेळी अनिल कांबळे यांनी असे सांगितले की एनगेवाडी येथील ज्या नागरिकाना जमीन नाही त्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्तींचा मृत्यू झाला तर त्यांचा मृत्यू देह तहसील कार्यालया समोर अंत्यविधी करण्यास येईल असे सांगितले त्यावर संबंधित तहसीलदारांनी मातंग सम्शशानभूमीसाठी लवकरात लवकर या सम्शानभूमीचा प्रश्न निकाली काढावे असे मातंग समाजाच्या जनतेची भावना आहे
चौकट
मानवी हक्कअभियान लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांनी व्ही आर पाटील नायब तशिलदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी असे सांगितले की मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संपर्क केला असून मी येगेवाडी येथे कर्मचारी पाठवून देतो असे सांगितले होते परंतु एक तास रस्त्यामध्ये प्रेत ठेवले होते परंतु वाट पाहून रस्त्याच्या कडेलाच अंत्यविधी करण्यात आली