देवणी / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेकऱ्याना हेक्टरी 50 हजार रु नुकसानभरपाई अनुदान देवुन सर्व सवलती देण्याबाबतीत निर्णय महाराष्ट्र शासनाने घावा आशी राष्ट्रीय मराठा पार्टी ने मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्यात पावसाने थैमान घातले असुन सोयाबीन,कापूस ईतर पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे .आपल्या शासनाने हेक्टरी 10 हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर
केले आहे.
शेतकऱ्यांचे विज बिल माफ करण्यात यावे, विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क व शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे,पिक कर्ज माफ करण्यात यावे, अतिवर्ष्ठीने पडलेले घरे शासनाने बांधून देण्यात यावे व ईतर सवलती जाहीर करण्यात याव्यात अशी मागणी ” राष्ट्रीय मराठा पार्टी ” चे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर, लातुर युवा जिल्हा अध्यक्ष जंयजय सहयाद्री, देवणी तालुका अध्यक्ष अनिलराव पाटील, देवणी तालुका उपाध्यक्ष नागनाथराव हुडे यांनी देवणी चे तहसीलदार सुरेशराव घोळवे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडिटीवार यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.