लाईटीचा लपंडाव,दररोज पहाटे देवणी शहराचा विद्युत पुरवठा खंडीत
देवणी :
उन्हाळ्याची दिवस चालू आहेत तापमानाचा पारा चढल्याने गरमीच्या उकडा वाढला आहे.सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे.अशातच शहराचा दररोज पहाटेला विद्युत पुरावठा खंडित केला जातोय,यामुळं नागरिक गर्मीने उकड्याने हैराण होत आहेत.
शहरातील नागरिक भल्या पहाटेपासून एमएसबीच्या लाईन मॅन,ऑपरेटरला फोन वरून विचारपूस करत आहेत,संबंधित ऑपरेटरकडून नेहमी उदगीर वरून लाईट बंद केली जात असल्याचे कारण सांगितलं जातंय.एमएसबीच्या अधिकारी यांना फोन केल्यानंतर अधिकारी फोन उचलत नाहीत,कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निष्काळीजी पणामुळं दररोज पहाटेच्या वेळी लाईट बंद होत आहे.सातत्याने लाईट बंद चालू होतं असल्याने शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.गर्मीच्या उकड्याचा सामना करावा लागतं आहे.यामुळं शहरातील नागरिकामध्ये संतापच्या भावना व्यक्त होताना दिसून येत आहेत.देवणी शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकारी लक्ष देतील का?असा सवाल नागरिक करत आहेत…

