प्रिय शेतकरी मित्रांनो ,

🐖🐖🐖🐖🐖
डुक्करांचा बंदोबस्त
🐖🐖🐖🐖🐖

🐖 १) बांधावर अंडी फोडून टाका, वासांनी डुक्करे येणार नाहीत.
🐖 २) जुणे रबरी पादत्राणे जाळावे, उग्र वासामुळे डुक्करे येणार नाहीत.
🐖 ३) शेतात सलून मधील केस टाकावेत. उकरताना नाकात बारीक केस गेल्यामुळे परत शेतात फिरकणार नाहीत.
🐖 ४) गारबेज एंझाईम व मुट्टई रसम ची फवारणी करावी, असाह्य वासामुळे डुक्करे येणार नाहीत.
🐖 ५) पिकाच्या चौहबाजूनी राजगीरा लावावा.
🐖 ६) डुकरांच्या वाटेत गुलाल टाकावा. लाल रंग समजून डूक्कर शेतात येणार नाहीत.

उंदिर
🐭🐭 उंदीर मारण्याचा सोपा उपाय

डाळीचे पीठ (बेसन) १/२ किलो +
१ किलो सिमेंट + पाणी एकत्र करून लहान गोटीच्या आकाराच्या गोळ्या तयार करुन ठीक ठीकाणी पसरल्याने उंदरापासून मुक्ती मिळते.
पिकाला पण उंदरापासून उपद्रव असल्यास हाच उपाय करावा

उंदीर
एक सोपा उपाय सांगतो.एक किलो थायमेट किंवा झिंक फास्माईड च्या ४ पुड्या घ्या,एक किलो गोडेतेल घ्या,
आणि दोन किलो चुरमुरे (भडंग) घ्या आणि हे सगळे पदार्थ एका घमेल्यात पुर्ण मिसळतील याची दक्षता घ्या
आणि नंतर तुमच्या पिकामध्ये टाकून द्या पण टाकताना सर्व क्षेञात पडेल याची दक्षता घ्या.
आपणास उंदरां पासून 100% फरक पडेल.
तेलामुळे थायमेटचा वास येणार नाही आणि चुरमुर्याला थायमेटचे विष लागल्यामुळे आणि ते खाल्याने उंदीर मरतात. आपणास ऊसाचे संरक्षणास फायदा होईल.

ओले खोबरे बारीक करून झिंक फॉस्फेट मध्ये भिजवुन जेथे प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणी टाकल्यास किंवा सर्व सरित टाकल्यास कमी खर्चात चांगल उपाय होतो.

1: रानटी जनावरांना शेतीपासून दूर ठेवण्यासाठी उपाय….

प्रत्येकाकडे 2 चाकी 4 चाकी आहे . आम्ही त्याचे इंजिन ऑइल बदलतो ते फेकून ना देता घरी घेऊन या .. घरी एखाद पोत.. गोणपाट … फाटके जे आता धान्य भरून ठेवण्याच्या कामात ना येणार ..अस घ्या ..त्याला हे खराब ऑइल छान भिजेल अस लावा त्यावर ..खराब झालेलं फेकून देऊ शकतो असे मिरची पावडर शिंपा.. आणि या गोनपाटाला दोन उभ्या काडीच्या साहाय्याने पडद्या सारख शेतात ज्या बाजूने जनावरे येतात त्या बाजूस लावा ..
परिणाम नक्कीच दिसेल ..
खर्च अजिबात नाही..सर्व फेकून द्यायच्या वाया जाणाऱ्या वस्तू वापरून आपण आपल्या शेतमालाची सुरक्षा करू शकतो

१) डुकरांसाठी अजुन सोपा उपाय
एका शेतकऱ्याचा अनुभव बांधा वर 10,12 फुटाच्या अंतरावर 2 फूट काडीला पिवळ्या कापडी फडक्यात डांबर गोळी बांधून बांदाला खोसून द्या डुकरे येत नाहीत खात्रीशीरपणे सोपा उपाय आहे, करून बघा

🐿🐿🐿🐿🐿🐿🐿
खार / खड्या / गिलहरी
🐿🐿🐿🐿🐿🐿🐿

फळे, भाजीपाला व फुले यांच्यावर आवडीने ताव मारणारा गोंडस प्राणी म्हणजे खार (खारूताई किंवा खड्या किंवा गिलहरी) बऱ्याचदा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतो. हिवाळ्यात उपजीवीकेसाठी लागणारे अन्न आपल्या बिळात साठवण्यासाठी शरद ऋतूत (पानगळीत) हा प्राणी विशेष सक्रीय असतो व या काळातील त्याच्या साठेबाजीच्या प्रयत्नांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. परंतु ऋतूच्या बदलानुसार त्याच्या या सवयीची माहिती शेतकऱ्यांनी विशेष अभ्यासलेली नाही असेच दिसून येते. साठवणी करीता लागणारे अन्नही टिकाऊ प्रतीचे असावे याचे उपजत ज्ञान निसर्गाने त्याला दिलेले आहे. कपाशीतील सरकी, मक्याचे दाणे, छोटे पक्व न झालेले नारळ, कोंबड्या व इतर पक्षांसाठीचे खाद्य म्हणजे जे पदार्थ सहज उचलून बिळात नेता येतात व दीर्घकाळ टिकतातही. अशाप्रकारे मिळवलेले अन्न आपल्या वास्तव्याच्या परीसरात ठिकठिकाणी पुरून ठेवणे ही त्याची सवय आहे. कधी गम्मत म्हणून पिकांवरील फुलांचीही नासधूस करतात.

उपाय
👉 लिंबू व संत्र्याच्या साली शेतातील जमीनीत ठिकठिकाणी किंचित खोलीवर पुरल्यास त्या जमीनीत बिळे करण्या पासून हा प्राणी परावृत्त होतो.
👉 या प्राण्याचे गंधज्ञान अतिशय तीक्ष्ण आहे. मानवी अथवा कुत्र्याचे केस शेतात विस्कटून टाकल्यास या गंधामुळे कुत्रा अथवा मनुष्याच्या अस्तित्वाच्या भीतीने त्या परीसरात शिरकाव करीत नाही.
👉 पिकाच्या चारही बाजूने एक किंवा दोन ओळी लसूण किंवा ओवा पेरल्यास या पिकांच्या उग्र वासामुळे खार तसेच ससे व हरणेही परावृत्त होतात.
👉 वाळलेल्या लसणाची भुकटी (पावडर) शेतजमीनीवर विस्कटून टाकल्यास येणाऱ्या उग्र वासामुळे हे प्राणी त्या भागात जाणे टाळतात.
👉 त्यांच्या अन्न व पाण्याची व्यवस्था झाडाखाली करून दिल्यास पिकाचे नुकसान कमी होते.
👉 पिकांवर FFJ (फरमेंटेड फ्रुट ज्युस), OHN (जडीबूटी संजीवक) गारबेज एंझाइम यांची नियमित फवारणी असल्यास, या एंझाइमच्या आंबट गोड वासाने ससे, हरीण व खार हे प्राणी पिक खाण्यापासून परावृत्त होतात.

महत्वाचे
👉 या प्राण्यांना इजा पोहोचवून त्यांना आपल्या पिकाचे रक्षण करणे हे नैसर्गिक शेतीच्या तत्वांविरूद्ध आहे. म्हणून त्यांना परावृत्त करणे हाच उत्तम उपाय आहे
👉 पिंजरा लावून हे प्राणी पकडून दूर सोडणे हा प्रयत्न निरर्थक आहेत कारण अनुकूल परीस्थितीत यांची पैदास खूप झपाट्याने होते. पकडून सोडलेला प्राणी जर मादी असेल तर कदाचित तिच्या पिलांचा उपासमारीने मृत्यू होऊ शकतो.
👉 आपल्या चंचल स्वभावामुळे हा प्राणी अन्न शोधण्यात तरबेज आहे. शेतातील पिकाच्या रूपाने सहजसाध्य विपूल अन्नसाठ्यामुळे आकर्षित होऊन ते पिकाला इजा पोहोचवतात परंतु वर दिलेल्या उपायांमुळे वारंवार परावृत्त केल्यास ते पिकात येणे कायमचे टाळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp