26 जानेवारी 1950 हा दिवस सर्वस्व गमावलेल्या
समाजाच्या अस्मितेचा दिवस. ज्या दिवसाने सामान्य माणसाला पत प्रतिष्ठा मिळवून दिली. पृथ्वि तलावरिल अनेक राष्ट्र शोषक राष्ट्रांच्या जोखडातून मुक्त झाली. मात्र आजही कांही देशात राजेशाही तर कांही देशात हुकूमशाही आहे. बहुतांश राष्ट्रांने लोकशाहीचा स्वीकार केला.सर्वात मोठी लोकशाही असणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. ७ धर्म ६४४७ जाती, अनेक पंत, हजारो बोलीभाषा आणि मानवी समूह याच देशात गुण्या गोविन्दाने नांदतो. याला घटना निर्माते डॉ० बाबासाहेब आंबेडकर करणीभुत आहेत. नव्याने स्वतन्त्र झालेल्या प्रत्येक राष्ट्रांला स्वतंत्र कारभार हाकन्यासाठी राज्यघटना लागते . मग ती लिखित असो कि अलिखित . मात्र ज्या देशात बहिश्क्रुत म्हणून गनल्या गेलेल्या करोडो लोकांना स्वच्छ हवा, स्वच्छ अन्न, स्वच्छ निवारा,स्वच्छ विचार, मांडण्याची मुभा नव्हती. अशा देशात अलिखित राज्यघटनेचा स्वीकार झाल्यास सकाळी माणसाच्या रांगेत उभ राहिलेला माणुस संध्याकाळी गुलामाच्या रांगेत उभा राहील हि मोठी भीती बाबासाहेब आंबेडकर यांना होती. म्हणून त्यांनी लिखित राज्यघटनेला प्राधान्य दिले. कर्तव्या शिवाय अधिकार म्हणजे अराजकता आणि अधिकारा शिवाय कर्तव्य म्हणजे गुलामगिरी. पिढ्यानं पिढ्या अराजकतेमुळे गुलाम झालेल्या सामान्य माणसाला न्याय तेव्हाच भेटू शकतो जेव्हा संविधान लिखित असेल.
या महान संविधानाची कलमवार कायदे विषयक इमारत बांधन्याचे कामं बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातून झाले. हि जगातील महान घटना आहे. संविधान निर्मितीचे कामं भारतात दुसर कोणीतरी केल आसत हे तितकेच सत्य. पण यथा कदाचित हेच संविधान इतर कोनाच्या हातून लिहिले गेले असते तर घटनेचा चेहरा समतावादी
आणि अंतरंग मनूवादी राहिले असते हे सत्य कोन्हिच नाकारू शकत नाही. भारतीय संविधान निर्माण करताना डॉ० बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक देशाच्या सविधानाचा अभ्यास केले.त्यामुळे इतर देशाच्या राज्यघटनेत जि मौलिक कलमे आहेत ती भारतीय सविधानात सापडतील मात्र जे भारतीय सविधानात आहे ते इतर संविधानात मुळीच दिसणार नाहीत हे अभिमानाने सांगावे लागेल. अन्याय ,अत्याचार, शोषण , भूक बळी, यात होरपळुन गेलेल्या बहुजनातिल बहिश्क्रुत समाज आणि महिलांना मुक्ती मिळून देण्यासाठी डॉ० बाबासाहेब आंबेडकर हेच हवे होते. गुलामी काय असते,जगन कशाला म्हणतात, वेटबिगारी ,लाचारी ठराविक जात समुहाच्याच वाट्याला का ? शिक्षण, व्यापार, उधोग , सत्ता संस्कृतीवरं ठराविक वर्गाची एकाधिकारशाही कशी ? हजारो वर्ष शिक्षण बन्दि- रोटी बंदि – कपडा बंदी – विचार बंदी असेल तर त्या समजाची प्रगती कशी होणार ? शिक्षण हे सर्व समश्यावर एकमेव उपाय तीच दारे सामान्य शोषित समाजाला बंद असतील तर त्यांच्या आयुष्याची कशी राख होते हे विदारक चित्र डॉ० बाबासाहेब आंबेडकर यांनी जवळून पाहिले होते. म्हणून संविधान निर्मिती साठी फक्त डॉ० बाबासाहेब आंबेडकर हेच योग्य ठरणार होते. केवळ गुलाम जात समूहात जन्मले म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातून संविधान लिहिले गेले नाही तर १९४७ ला ते symbole of knowledge होते नि २०२२ ला हि symbole of knowledge आहेत उद्याही राहतील . M.A Ph.D .Dsc. LLD .Dilit. Bar At Law पदवी घेणारे डॉ० बाबासाहेब आंबेडकर भारतातील नव्हे जगातील एकमेव विद्वान होते. समाजकारण , धर्मकारण, अर्थकारण , राजकारण , पर्यावरण , डशिकषण, न्याय, परराष्ट्र नीती, नीती शास्त्राचा चिकित्सक अभ्यास करणारे एकमेव विद्वान होते. अशा महा मानवावर
बलशाली देशाच्या संविधान निर्मितीची जबाबदारी पडली. २ वर्ष ११ महिने १८ दिवसाच्या अथक परीश्रमानंतर संविधान पूर्णत्वास आले. एका सशोधकाच्या संशोधना अंती असा खुलासा पुढे आला कि डॉ० बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान लिहिले नसते तर आणखीन २० वर्ष जास्त जगले असते. ३९५ कलमाचे हे महान न्यायिक संविधान तुम्ही लिहिला नसता तर बहिश्क्रुत समाजातील कोणताच व्यक्ती , आदिवासी आणि उपेक्षित महिला समाज आज लोकशाही गणराज्याचा आस्वाद घेतला नसता. १५ आगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले ते स्वातंत्र्य २६ जाने १९५० ला खऱ्या अर्थाने बलवान ठरले . बंदिस्त स्वातंत्र्याची चौकट याच दिवसी उधवस्त झाली. राजेशाही गेली, पेशवाई गेली, गडकरी गेले, दिवाण गेले, सरदार गेले, रावसाहेब गेले, राव बहाद्दुर गेले, कुलकर्णी गेले,देशमुखी संपली आले ते प्रजासत्ताक राज्य. गणराज्य शासन प्रणालीने जन्म घेतला. राजा बोलें दल हाले हा विचार कालबाह्य ठरला. जनता बोलें नि राज सिंहासन हाले या विचारान बाळस धरलं.
एक व्यक्ती एक मूल्य लोकशाहीचा सिद्धांत बनला.समता,स्वातंत्र्य, बन्धुभाव आणि सामाजिक न्याय, व कायद्या पुढे सर्व सामान या विचारला प्रौढत्व आलं. 1950 ला संविधान अमलात आले नसते तर ” अन्याया विरुद्ध लढन्याची हिम्मत सर्वसामान्य माणसात निर्माण झाली नसती. आदिवासी माणुस गणराज्यात सत्तेचि फळ चाकला नसता. देशातील दलित वंचित माणुस गावची वेस राखत राखत कुजला असता. महिला समाजाच्या आयुष्याची होळी रोजच पेटली असती.माणसाने माणसांना गुलाम करणे सामाजिक प्रतिष्ठा ठरली असती.माणसाचे जातिवर मूल्यांकन करणारी मनुस्मृती घरा घरात चित्ता पेटवली असती. आदिवासी समाजाच लेकरू राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 73 व्या गंनतंत्र दिनी दिल्ली राजपतवर तिरंगा फडकला नसता. काँग्रेसच्या सर्वे सर्वो सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, भारताच्या महिला वित्त मंत्री निर्मला सीताराम, महिला बाल विकास मंत्री स्मृती इराणी,रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ,बहनजी मायावती, ह्या संसदेत दिसण्या ऐवजी स्वयंपाक घरात दिसल्या असत्या.
जर्मनिने जगाला गटे आणि हेगेल यांच्या सारखी नर रत्ने दिली तर भारताने जगाला प्रज्ञासूर्य दिला ज्यांच्या हातून भारताचे संविधान लिहिले गेले.
खऱ्या अर्थाने 26 जाने 1950 ला लोकशाही पर्वाला सुरुवात झाली. दि. 25 जाने 2022 रोजी दिल्लीच्या राजपतवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते नौदल,भुदल, वायुदल, सैन्याच्या शक्तिचे प्रदर्शन होईल. 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे चित्र रथ प्रदर्शन होईल, रनगाडे व लढाऊ विमनाचे प्रात्यक्षिक होईल. हे पाहण्याचे भाग्य बलशाली भारत वासियाना मिळाले ते फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे. कारण त्यांच्या हातून सविधान निर्मितीची पूर्तता झाली नि लोकशाही गणराज्याचा दिवस उजाडला त्यामुळे ज्या समाजाची कवडिची किंमत नव्हती तो समाज कायदे मंडळ, कार्यकरी मंडळ आणि न्याय मंडळात अव्वल ठरला. कचऱ्यात कुजनाऱ्या समाजाचे सोने झाले. कंदमुळे खाऊन जंगलात उघड्यावर जगणारे आदिवासी देश चालवू लागले .पशु, पक्षा सारखे सैरा वैरा धावनारे लोक संघटन करू लागले .चाकरी करणारा हवेलिचा मालक बनला.
तुम्हीही माणसे आहात तुम्हालाही माणसा प्रमाणे
जगण्याचा निसर्ग दत्त अधिकार आहे अशी मोहर मारली गेली . बघता बघता निळ्या आकाशाची वारे गतिमान झाली आणि कालचा गुलाम माणुस पक्षी होऊन आकाशात भरारी घेऊ लागला.
या सोनेरी दिवसाचा साक्षीदार 26 जाने 1950 चा दिवस असून याचे कर्ते कर्विते डॉ० बाबासाहेब आंबेडकर आहेत.
प्रा. शिवाजीराव देवनाळे
प्रसिद्ध विचारवंत तथा व्याख्याते
मो. 9850344110