साहेब… सडलेले सोयाबीन सरकारला पोहचवा…
शेतकऱ्यांचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे टाहो..
देवणी ः अतिवृष्टी व मांजरा नदीच्या पुराने देवणी तालुक्यातील सोयाबीन पिकाची प्रचंड नासाडी झाली.आम्हा शेतकऱ्यांचे अर्थकारणच बिघडले..नुकसान झालेले सोयाबीन सरकार पर्यंत पोहचवा असा टाहो देवणी भाजयुमो तालुका अध्यक्ष रामलिंग शेरे व जि प सदस्य प्रंशात पाटील व शेतकऱ्यानी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीससमोर सोमवारी फोडला…अन नुकसान झालेले सोयाबीनचे पँकीग असलेला डबा सुपुर्द केला. गौर ता.निलंगा येथील दौऱ्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांची देवणी भाजयुमो शिष्टमंडळाने व शेतकऱ्यानी भेट घेतली . देवणी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे व मांजरा नदीच्या पुरामूळे देवणी तालुक्यातील हजारो हेक्टर खरीप हंगामातील पिकाचे नुकसान झाले आहे . बळीराजाच्या हाती आलेला घास या आस्मानी संकटामूळे हिरावला गेला ,बळीराजा हा कायम संकटाच्या गर्तेत आडकतो आहे ,पुरामूळे पुर्ण पिकेतर गेली आहेत ,आता शेताची मशागत करायची म्हटल तरी शिवारात सर्वत्र दुर्गधी पसरली आहे , त्यामूळे शेतकर्याच्या आरोग्याचा विषय गंभीर झाला आहे,याकडे लक्ष देवुन देवणी तालुक्यातील शेतकर्याचे सरसकट पंचनामे करुन तात्काळ एकरी पन्नास हजार रु नुकसान भरपाई द्यावी व बांद्रा निवासी असलेल्या मूख्यमंत्र्यांना अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर विरोधीपक्ष म्हणुन तुम्ही आमचे दुत व्हा अशी विनवणी यावेळी केली.
विरोधीपक्ष नेते देवेद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर, लातुर जिल्हाचे माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निंलगेकर साहेब, खासदार सुधाकर शृंगारे ,जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड ,आमदार अभिमन्यु पवार प्रदेश सचिव अरविंद भाऊ पाटील निंलगेकर यांनी पुर भागाची पहाणी केली ,सोयाबीन नुकसानीचे पार्सल व निवेदन जिल्हा परिषद सदस्य प्रंशात पाटील, भाजयुमो तालुका अध्यक्ष रामलिंग शेरे , जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो संगम पताळे, हणमंत बिरादार,प्रशात पाटील , भाजयुमो तालुका चिटणीस राज गुणाले , आदीनी दिले.