सुशील कुमार शिंदे तुम्ही कोणत्या तोंडाने बोलता…???


देगलूर / प्रतिनिधी.. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे देगलूर बिलोली मतदार संघात म्हणाले वंचित बहूजन आघाडी दलित, अल्पसंख्याक समुहाची दिशाभूल करीत आहे…!!
सुशील कुमार शिंदे साहेब तुम्ही एकटे दलित म्हणून कॉग्रेस पक्षात लाभार्थी आहात, तुमच्या सारखे किती दलितांना, आंबेडकरवादी लोकांना कॉग्रेस पक्षाने उमेदवारी देऊन आमदार, खासदार, मंत्री बनविले.???
तुम्हाला आजही बापाच्या जागेवर पोरगाच उमेदवार पाहिजे दुसरा सामान्य वा फाटका माणूस नको…???
कॉग्रेस हा सवर्ण मानसिकतेचा पक्ष आहे हे अनुभवाने आंबेडकरवादी आणि अल्पसंख्याक समाजातील जनतेने समजून घेतले आहे…!!

सत्तर वर्षे कॉग्रेस पक्षाने दलितांची मते घेऊन तुमच्या सारख्यांची घराणेशाही निर्माण केली. आणि लोकशाहीचा गळा घोटला. सर्वसामान्य माणूस भिकारी बनवला…!!

कॉग्रेस पक्षाने मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न सतरा वर्षे चिघळवतं ठेऊन दलितांचे हत्याकांड घडविले हे कॉग्रेस पक्षाची बेईमानी, फसवणूक आंबेडकरवादी समूहाने ओळखली आहे…!!

जगात गाजलेल्या अमानुष हत्याकांडाच्या संदर्भातील खैरलांजी गावाला तंटामुक्त गावाचा पुरस्कार देणारे सरकार कॉग्रेस पक्षाचेच होते हे आंबेडकरवादी जनता विसरली नाही…!!

दलित किंवा आंबेडकरवादी समूहाची खरी फसवणूक आणि वेळोवेळी दिशाभूल कॉग्रेस पक्षाने केली आहे…!!

गरीबी हटाव चा नारा दिला आणि भांडवली व्यवस्था ऊभी केली, हे फसवणूक, दिशाभूल नाही का..??
हे आता जनतेला अनुभवाने कळु लागले आहे…!!

अल्पसंख्याक समुहाला भिती दाखवून कॉग्रेस पक्षाने गेली सत्तर वर्षे मुस्लिम समूहाची मते घेतली सत्ता राबविली मात्र आजही अल्पसंख्याक समुह असुरक्षित आहे, त्याची मॉबलिंचिंग होते तेव्हा कॉग्रेस पक्ष कुठं असतो.तुम्ही कुठे असता ,तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते कुठे असतात..???

जेव्हा CAA, NRC चा कायदा लागू होतो तेव्हा तुम्ही कुठे असता, तुमचा कॉग्रेस पक्ष राज्यसभेत बहुमत असुनही काय करीत असतो…???

कॉग्रेस पक्षाने सत्ता असतांनाहीअल्पसंख्याक समूहासाठी सच्चर कमिटीने केलेल्या शिफारशी लागू का केल्या नाही…???

म. पैगंबर साहेबांवर सोशल मीडियातून टीकात्मक टिप्पणी करुन धार्मिक तेढ निर्माण केली जाते त्यावर कायदा का बनविला नाही…???

जेव्हा अयोध्येत बाबरी मस्जिद शहीद होत होती तेव्हा केंद्रात कॉग्रेस पक्षाचे सरकार होते तेव्हा तुम्ही कुठे होता,…??
शासन म्हणून कॉग्रेस पक्षाने काय केले…???

प्रश्न अनेक आहेत, जनता अनुभवाने सुज्ञ झाली आहे.
तुम्ही सत्तेच्या नशेत आहात म्हणून तोंडात येईल तसे वक्तव्य करीत आहात, मात्र जनतेला कळून चुकले आहे वंचित बहूजन आघाडी आता घराणेशाही संपवणार आहे…!!
जय भीम
@.. भास्कर भोजने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp