प्रज्ञा.. शिल…करूणा तेथे कांहीच कमी पडेना..!!
।।विवाहबाह्य संबंध आणि फँशन।।
========!!!!========!!=======
विवाहबाह्य संबंध ही हल्ली फॅशन बनत चालली आहे.शहरात या विकृतीने थैमान मांडले आहे.रोज टीव्ही सिरियल्स आणि वाट चुकलेल्या मित्र मैत्रिणींचे अनुकरण करत आपण आपला आत्मा आणि मने गहाण ठेऊन जे पाऊल उचलत असतो ते कितपत योग्य हे एकदा स्वतःच्या मनाला विचारायला हवे.
ज्या पतीशी आपण सात जन्म एकत्र राहायची वचने अग्नीच्या साक्षीने देतो, गळ्यात पतीच्या नावाचे मंगळसूत्र आजन्म घालतो, भाळात सौभाग्याचे लेणे म्हणून कुंकू लावतो या साऱ्या प्रथा मूर्खपणाच्या असतात का ? सारे जग भारतीय संस्कृतीचा स्वीकर करतंय अन् आपण पाश्चात्य संस्कृती अंगिकारतोय…
खुशाल हल्ली स्त्री व पुरुष दोघेही आपल्या पती/पत्नी व्यतिरिक्त एखादे असावे ही भावना मनात ठेवतात. आपल्या लेकरा बाळाची, समाजाची व नातेगोत्यांची लाज आपण बाळगत नाही…।
प्रेम हे गोंडस नाव देऊन आपण या विकृती लपवत असतो.
लग्नापूर्वी कित्येकांनी प्रेम या शब्दाचा अर्थ न समजता ज्या सेक्स च्या मैफिली रंगवल्या असतात त्या सुद्धा प्रेमाचा घेतलेला अतिशय घाणेरडा अर्थ होय.पण लग्नापूर्वी झालेले जे काही असेल ते लग्नाच्या अग्नीत जाळून खाक केले पाहिजे.
पतीच्या आयुष्यात मधुचंद्राची रात्र ही त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र असते, लग्नापूर्वी केलेल्या चुकांमुळे आपण आपल्या पतीसाठी काय शिल्लक ठेवलेले असते? व पुरुषांनी आपल्या पत्नीसाठी काय शिल्लक ठेवलेले असते? हे एकदा मनाला विचारणे गरजेचे आहे.
नाते टिकवायचे असेल तर जे आहे ते स्वीकारणे याशिवाय पर्याय नसतो,पण प्रत्येकाचे मन इतके मोठे असेलच असे नसते….
एखादा पुरुष जगातील सर्वात मोठी दुःखे सहन करू शकतो पण आपल्या पत्नीची अनैतिक वागणे कदापि सहन करणार नाही….तिच पत्नी पण अशा पतीचे वागणे सहन करु शकत नाही… पर्यायाने आज 90℅ घटस्फोट यामुळेच होत आहेत…
हल्ली मात्र पतीसमोर राजरोजपणे मित्रांशी होणारे चॅटिंग ही कुठली संस्कृती म्हणावी..?
जे स्त्रियांबाबत तेच पुरुषांच्या बाबतही असेच..आहे
कुठे निघालोय आपण. जगात ज्या भारतीय विवाह संस्कृतीचा आदर्श दिला जातो ती संस्कृती टिकवण्याचे काम हे प्रत्येक विवाह झालेल्या पती व पत्नीचे असते. अशी भोगप्रवृत्ती हल्ली समाजात फारच बळावत निघालेली आहे….
अशी चँटिंग आपली पत्नी ……पत्नी राहूदे! बहीण, भाची, पुतणी.. कोणत्याही नात्यातील विवाहित स्त्री ला जर कोणी पुरुष असा प्रेमाचा लग्नानंतर प्रस्ताव ठेवत असेल तर तो तुम्हाला चालेल का …रुचेल का..?
याचे उत्तर जर होय असेल तर त्याला या गोष्टीची माफी स्वतः नक्की देईन…..
प्रेम या नावाखाली स्वतःची पत्नी कोणी दुसऱ्यांशी असावी असे वाटू शकत नाही….आणि स्वतः चा पती पण इतरांशी पती असावा असे वाटू शकत नाही… हे जर खरे असेल तर स्वतः तसे का वागावे ?
माणसाचे मन मोठे विलक्षण आहे..जोवर दुसऱ्याच्या बाबतीत घडते तोवर आपल्याला काही वाटत नाही, आपल्यासोबत घडले तर मात्र डोक्याचा तीळपापड…
माणूस हा स्वतःसाठी वकील आणि दुसऱ्यासाठी न्यायाधीश असतो..स्वतःच्या हजार चुका मान्य!! दुसऱ्यांनी केली तर त्वरित टोकाचा निर्णय….
प्रत्येक विवाहित स्त्री च्या आयुष्यात लग्नानंतर पहिले व शेवटचे प्रेम जर पती आणि पतीच्या आयुष्यात तिची पत्नी असेल तर जीवनासारखी सर्वात सुखाची गोष्ट दुसरी कोणती असेल…?
प्रेमच करायचे असेल तर ते त्यागात आहे…भोगून व्यक्त करतात ते प्रेम नव्हे!! तर प्रेम या पवित्र नावाला दिलेली सर्वात घाणेरडी वागणूक असेल ……
हल्ली प्रेम या नावाखाली विविध नखरे करून पैसे उकळणे व स्वतःचे घर भरणे ही फँशनेबल कला झाली आहे…..या मोहरुपी जाळ्यात जो अडकला त्याचे.. .घराचे… वाटोळे झाल्याशिवाय राहत नाही……हे जेव्हा कळले तेव्हा वेळ गेलेली असते…म्हणून समस्त मित्र बंधू भगिनींनो आपण या क्षणिक सूखासाठी स्वतः चे शील, चारित्र्य गहान न ठेवता आपल्या लेकराबाळासमोर -समाजासमोर ताठ मानेने जगा …।*अशा स्त्री ला विनंती की,.... तुझ्यासाठी व तुझ्या कुटुंबासाठी दिवसभर जो राबतो त्याच्या नजरेत तुला खरे प्रेम दिसत नाही का ?*
जे मंगळसूत्र तू अभिमानाने घालतेस तो केवळ दागिना नाही! तर तू तुझ्या पतीला दिलेले ते वचन आहे…
आणि अशा पुरुषाला पण हे सांगणे..घट भरले तुझ्या घरी का वणवण फिरशी बाजारी।।……आधी घरच्या लक्ष्मीवर प्रेम कर निश्चितच आत्मसूख लाभल्याशिवाय राहणार नाही..
जे लिहल आहे ते समजते का बघा…जे लिहले नाही ते सुद्धा समजावून घेण्याचा प्रयत्न करा…तरीही नाही जमले तर या नात्याला किमान “प्रेम” या उदात्त आणि पवित्र नाव मात्र देऊन त्याची अवहेलना मात्र करू नका..….
चारित्र्य हा माणसाचा खरा अलंकार आहे…हे चारित्र्य… शील…. ज्याचे बिघडले तो स्वतःच्या , समाजाच्या व घरा-दाराच्या नजरेतून पडलेला असतो …..
स्वतः चे आचरण चांगले ठेवा ..मुलामुलींना घडवा…👏👏