संविधान समस्त भारतीयांचे आशास्थान – ज्ञानेश्वर भाऊ सुर्यवंशी

संविधान मसूदा समिती व या समितीचे अध्यक्ष प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची संस्कृती व प्रकृती लक्षात घेवून सुदंर असे संविधान तयार केले 2 वर्ष 11 महिणे 17 दिवसाच्या परिश्रमाची ही निर्मिती आहे.

संविधान निर्मितीचा इतिहास व वाटचाल, प्रास्ताविक, मुलभूत हक्क, मुलभूत कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे निती-निर्देश समजून घेण्यासाठी संविधान दिवस साजरा करावयाचा आहे. खरे तर हा नागरीकत्वाचा उत्सव आहे. राष्ट्रीय सण म्हणून साजरा करताना, समाजहितासाठी व देशहितासाठी नागरिक म्हणून आपले योगदान काय? हयाचे आत्मचिंतन केले पाहिजे यासाठी संविधान दिवस आहे. शाळेतील मुले-मुली महाविद्यालयातील तरुणवर्ग, शासन-प्रशानातील अधिकारी कर्मचारी कायदे मंडळ, कार्यकारी यंत्रणा, न्यायपालिका, प्रसारमध्ये आणि सर्व नागरिकांनी संविधान तत्वे माहित करून घेतली पाहिजेत. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान अर्पण झाले. 26 जानेवारी 1950 पासून संविधानाचा अमल सुरू झाला, तरी संविधानाची मुलभूत तत्वे, लोकांना लोकप्रतिनिधी व लोकसेवकांना पुरेसी माहित • नाहित म्हणून कायद्यानुसार वर्तन नाही, आगलबजावणी नाही यामुळेच अनेक प्रश्न व समस्या समाजात व देशभरात निर्माण झाल्या आहेत.

गरीबातल्या गरीब माणसाला झोपडपट्टीतल्या अन् पालीतल्या स्त्रि- पुरुषाला

एकाच मताचा अधिकार आणि हवेलीतल व महालातील स्त्रियानाही एकाच मताचा
अधिकार दिले. शिकण्याचे, वाचण्याचे बोलण्याचे, लिहण्याचे, फिरण्याचे संपत्ती
संचयाचे मुलभूत अधिकार स्वातंत्र्य दिले. अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या अत्यंत महत्वपूर्ण गरजांची पुर्ती व्हावी या संबधीतचा विचार संविधानाने केला आहे.

त्याचबरोबर तरुणांनो, तुम्ही वाचाल तर संविधान वाचेल. देशाच्या भविष्याची मोठी हानी टाळायची असेल, तर देशाला एकसंघ ठेवायचे असेल, तर नव्याने सुरुवात करावी लागेल, बालवाडीपासून ते कॉलेजपर्यंतच्या प्रत्येक वर्गामध्ये संविधान हा विषय अभ्यासासाठी अत्यावश्यक म्हणून ठेवावा लागेल. त्याचबरोबर या देशातील विविधतेतील व अनेकतेंतील एकता अबाधित ठेवण्यासाठी मुलांमध्ये, तरुणांमध्ये वाचन संस्कृती वाढवावी लागेल. त्यासाठी शासनस्तरावरून जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. तरच या देशाचे संविधान आणि त्याव्दारे या देशाची अखंडता आणि एकता कायम राहणार आहे. कारण आजचा तरुण वाचला तरच त्याला सत्याची माहिती होईल तसेच तर्कहीन, तकलादू, फसव्या आणि देशविघातक गोष्टी कोणत्या आहेत हे त्याला ताबडतोब कळेल. थ्योडक्यात, तरूणांनो तुम्ही वाचाल तरच संविधान आणि देश वाचणार आहे.

म्हणून आजपासून भारतीय संविधान आणि आपली कर्तव्ये समजून घेणे काळाची व जिवणाची गरज आहे.

संविधान संदेश

विवेक पसरवू जनाजनांत,संविधान जागो मनामनांत
समता, बंधुता, लोकशाही संविधानाशिवाय पर्याय नाही

कर्तव्य,हक्काचे भान मिळवून देते संविधान
संविधानावर निष्ठा हीच व्यक्तीची प्रतिष्ठा
संविधानाची कास धरू, विषमता नष्ठ करू
सर्वांचा निर्धार, संविधानाची स्वीकार
संविधानाची समानता, संविधानाची महानता
संविधानाने दिले काय,स्वातंत्र्य, समता, बंधुता,न्याय
संविधानाचा सन्मान हाच आमचा अभिमान
श्रध्दा,उपासनेचे स्वातंत्र्य हाच संविधानाचा मूलमंत्र
सबसे प्यारा संविधान हमारा
डरने की क्या बात है? संविधान हमारे साथ है,
मानसा मानसा जागा हो! संविधानाचा धागा हो !!

ना एक धर्मसे, ना एक सोचसे, यह देश चलता है संविधानसे

जय भिम! जय संविधान !! जय भारत !!!

(समाज भुषण)

श्री. ज्ञानेश्वर सुर्यवंशी (भाऊ) देवणीकर श्रमिक हक्क अभियान महाराष्ट्र. एन.सी.डी.एच.आर. भारत

मो. नं. 9421369298

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp