” मैने प्यारकिया चित्रपटातील हिरोईन भाग्यश्री पटवर्धन माधवराव पटवर्धन आणि राजर्षी शाहूमहाराज “

◆ आपल्या समाजातील ज्या लोकांना विशेषतः जास्त शिकलेल्या लोकांना ज्यांना आरक्षण म्हणजे #भिख वाटते , आरक्षण म्हणजे लाचारी वाटते , आरक्षण म्हणजे कुबड्या वाटतात त्यांच्या साठी हा लेखन प्रपंच

आपल्या मूलनिवासी बहुजन समाजातील लोकांना अर्थात SC / ST / OBC-कुणबी-मराठा मधील बहुतांश शिकल्या – सवरलेल्या लोकांना विशेषतः जास्त शिकलेल्या लोकांना आरक्षण म्हणजे कुबड्या वाटतात , आरक्षण म्हणजे भीक वाटते , आरक्षण म्हणजे लाचारी वाटते .

परंतु आपल्या मूलनिवासी बहुजन समाजातील महापुरुषांनी फार मोठा संघर्ष करुन हे आरक्षण अर्थात प्रतिनिधित्व मिळविले आहे . ते सहजा सहजी मिळालेले नाही . त्यासाठी फुले – शाहू – पेरियार – आंबेडकर यांना १८४८ ते १९५६ म्हणजे १०८ वर्षांचा संघर्ष करावा लागला .

आपल्याला मात्र हे आरक्षण फुकटात मिळाल्यामुळे त्यांची किंमत किंवा त्याचे महत्व वाटत नाही . जसे हवा म्हणून हवेची किंमत वाटत नाही . किंवा सूर्यप्रकाश फुकटात मिळतो म्हणून सूर्यप्रकाशाचे महत्व वाटत नाही .

आपल्या महापुरुषांचा इतिहास हा आरक्षण समर्थकांचा इतिहास आहे . आणि युरेशियन ब्राह्मणांचा इतिहास हा आरक्षण विरोधकांचा इतिहास आहे . याचा अर्थ हा आरक्षणाच्या नायकाचा आणि खलनायकाचा इतिहास आहे .

म्हणून आपले शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजून घेतले पाहिजे , ओळखले पाहिजे .

Idea_of_Reservation अर्थात , आरक्षणाची कल्पना ही राष्ट्रपिता जोतिराव फुलेंची . ही कल्पना त्यांनी प्रथम १८६९ ला आणि नंतर १८८२ ला इंग्रज सरकारपुढे मांडली .

Implimentation_of_Reservation अर्थात , आरक्षणाची अंमलबजावणी भारतात आधुनिक काळात सर्वात प्रथम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या करवीर अर्थात कोल्हापूर संस्थानात दि .२६ जुलै , १९०२ पासून केली .

#Policy_of_Reservation अर्थात , आरक्षणाची नीती किंवा धोरण विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून २६ जानेवारी , १९५० पासून निश्चित केले .

राष्ट्रपिता जोतिराव फुलेंच्या आरक्षण या कल्पनेला लागू करण्याचे काम त्यांचे पट्टशिष्य राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केले .

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दि .२६ जुलै , १९०२ रोजी सर्व ब्राह्मणेतरांसाठी ५० टक्के आरक्षणाची घोषणा आपल्या करवीर संस्थानात अर्थात कोल्हापूर संस्थानात केली .

६६४ संस्थानापैकी मूलनिवासी बहुजन समाजासोबत सामाजिक न्याय करणारी तीनच संस्थाने

१) करवीर अर्थात कोल्हापूर
२) बडोदा आणि
३)इंदौर …

दोन मराठा कुणबी व एक धनगर .

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जे ५० टक्के आरक्षण घोषित केले त्यातून केवळ चारच ( ४ ) जाती वगळल्या

( १ ) ब्राह्मण , ( २ ) शेणवी , ( ३ ) प्रभू ( ४ ) पारशी .

या चार पुढारलेल्या जाती सोडून ( वगळून ) बाकी सर्व जातींना अर्थात , ब्राह्मणेत्तरांना अर्थात मूलनिवासी बहुजन समाजाला आरक्षण अर्थात प्रतिनिधित्व घोषित केले याला म्हणतात Implimentation of Reserva tion अर्थात , आरक्षणाची अंमलबजावणी .

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण का दिले ? महाराजांनी अगोदर पाहणी केली आणि पाहणीत त्यांच्या लक्षात आले की , सरकारी दरबारी ७१ पैकी ६० युरेशियन ब्राह्मण उच्च पदाच्या नोकऱ्यांमध्ये होते . व ११ ब्राह्मणेत्तर होते . तसेच खाजगीत ५२ पैकी 45 युरेशियन ब्राह्मण नोकरीत होते व ७ ब्राह्मणेत्तर होते .

हा प्रशासनातील असमतोल दूर करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व ब्राह्मणेतरांसाठी ५० टक्के आरक्षणाची घोषणा केली . त्यापूर्वी सर्व मोक्याच्या व माऱ्याच्या जागी माधव , बर्वे या चित्पावन ब्राह्मणानी आपल्याच जातीतील लोकांना नोकऱ्या दिल्या होत्या .

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या या क्रांतिकारी निर्णयाला ब्राह्मणांनी विरोध सुरू केला खरे तर शाहू महाराज स्वतः राजे होते स्वतःच्या संस्थानात आरक्षण देणार होते . कोणाच्या घरातून किंवा खिशातून किंवा कोणत्याही ब्राह्मणांच्या संस्थानातून देणार नव्हते . तरी ब्राह्मणांनी ब्राह्मणेत्तरांच्या आरक्षणाला विरोध केला होता . त्यातील एका ब्राह्मणाने तर कळसच केला ,

त्याचे नाव अॅड . गणपतराव अभ्यंकर .

हा सांगलीच्या पटवर्धन संस्थानामध्ये नोकरीस होता . हा पटवर्धन कोण ? भाग्यश्रीचा आजोबा . ही #भाग्यश्री कोण ? ” मैने प्यार किया ” या हिंदी सिनेमातील सलमान खानची नायिका .

जसाही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व ब्राह्मणेत्तरांसाठी ५० टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीचा कायदा केला . तेव्हा सांगली संस्थानातील पटवर्धन संस्थानिकाचा एक मुनिम अॅड.गणपतराव अभ्यंकर सांगलीवरुन कोल्हापूरला आला व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेऊन

१) जातवार स्कॉलरशिप
२) जातवार नोकऱ्या देण्याच्या निर्णयाला विरोध केला .

त्यांच्या मते , लायकी पाहूनच स्कॉलरशिप व नोकऱ्या द्यायला पाहिजेत . खरे तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व ब्राह्मणेत्तरांसाठी जे ५० टक्के आरक्षण घोषित केले . ते स्वत : च्या अर्थात करवीर अर्थात , कोल्हापूर संस्थानातून , याचे सांगलीच्या पटवर्धन संस्थानातील अॅड . गणपतराव अभ्यंकराला वाईट वाटत होते .

का वाईट वाटत होते ? कारण त्यामुळे कोल्हापूर संस्थानातील युरेशियन ब्राह्मणांना नोकऱ्या मिळणार नव्हत्या , त्यांचे नुकसान होणार होते . ते होऊ नये म्हणून सांगली संस्थानातील हा ब्राह्मण कोल्हापूरला गेला व छत्रपती शाहू महाराजांना असे आरक्षण देऊ नये असा सल्ला दिला .

याला म्हणतात जातीय हित व जातीय चेतना , किंवा जातीय एकी , आजसुद्धा सर्व पक्षातील ब्राह्मणांमध्ये अशीच एकी आहे . ते सर्व पक्षात असून एक असतात आणि आपण एका पक्षात असून अनेक असतो . त्यामुळे त्यांच्यात असते एकी व आपल्यात असते बेकी .

आरक्षणाच्या मुद्यावर आजही युरेशियन ब्राह्मण कडाडून विरोध करतात . मग तो भाजपचा ब्राह्मण असो , काँग्रेसचा ब्राह्मण असो , सेनेचा ब्राह्मण असो , कम्युनिस्टांचा ब्राह्मण असो किंवा कोणत्याही पक्षाचा ब्राह्मण असो . सर्वांचा आरक्षणाला विरोध आहे .

काय आरक्षण कुबड्या आहेत ? काय आरक्षण भीक आहे ? काय आरक्षण लाचारी आहे ? जर असे असते तर , युरेशियन ब्राह्मणांनी आरक्षणाला विरोध केला असता ? यावर शिकलेल्या लोकांनी विशेषतः आरक्षणाच्या लाभार्थी लोकांनी गंभीरपणे विचार करायला हवा .

तर, अँड.गणपतराव अभ्यंकरांनी आरक्षणाला विरोध केला . राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे कर्ते सुधारक होते , बोलके सुधारक नव्हते . शिवाय ते फॉरेन रिटर्न होते .ॲड.गणपत अभ्यंकरांचा बामणीकावा त्यांच्या लक्षात आला .

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना घोड्याच्या पागेत ( तबेल्यात ) नेले त्या घोड्यांच्या तबेल्यात खूप घोडी होती . सर्व घोडी आरामाने आपल्या स्वतःच्या तोबऱ्यातील चंदी ( हरघरे / चणे ) खात होती .

राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि अॅड . गणपत अभ्यंकर हे सर्व पहात होते . तेवढ्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी तेथील मोतदारांना घोड्यांच्या तोंडाचे तोबरे सोडून त्यातील चणे / हरभरे खाली सतरंजीवर टाकायला सांगितले नंतर सर्व घोडी मोकळी सोडायला सांगितले . हे सर्व प्रात्यक्षिक अॅड.गणपत अभ्यंकर निमूटपणे पहात होते .

जसेही मोतदारांनी घोड्यांना मोकळे सोडून दिले . तेंव्हा जी तगडी घोडी होती , शक्तिशाली घोडी होती , बलशाली घोडी होतो , धडधाकट घोडी होती , निरोगी घोडी होती , मोठी घोडी होती , ताकदवान घोड़ी होती , शक्तिमान घोडी होती, ती सर्व घोडी सतरंजीवरील त्या हरभ-यावर ,चण्यावर तुटून पडली

आणि जी कमजोर घोडी होती , आजारी घोडी होती … लांबच उभी होती व दुरुनच पहात होती .. काय पहात होती ? ही ताकदवान घोडी , तगडी घोडी , शक्तिशाली घोडी , मोठी घोडी , मस्तवाल घोडी खाताना सुद्धा व्यवस्थित खात नव्हती . मग कशी खात होती ?

ती तोंडाने हरभरे खायची व मागच्या पायाने लाथा झाडायची, जेणेकरुन दुसऱ्या घोड्याने यात घुसू नये , त्यामुळे कमजोर घोड्यांनी विचार केला , कोणता विचार केला ? हरभरे खाण्यासाठी त्या तगड्या घोड्याच्या गर्दीत न घुसण्याचा विचार केला , असा विचार बिचाऱ्या अशक्त घोड्यांनी का केला ? कारण त्या मस्तवाल घोड्यांच्या गर्दीत घुसलो तर , हरभऱ्याऐवजी लाथाच मिळतील . मग कशाला गर्दीत घुसायचे ? असा विचार करुन बिचारी गरीब घोडी , अशक्त घोड़ी , कमजोर घोडी , लांबूनच ते दृष्य पहात होती .

तेंव्हा राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्या कमजोर घोड्याकडे बोट दाखवून अँड . गणपत अभ्यंकराला म्हणाले , “अभ्यंकर , या कमजोर घोड्यांचे काय करु ? त्यांना गोळ्या घालू ?

असे होणार हे मला अगोदरच माहीत होते . म्हणून मी प्रत्येकाचा वाटा प्रत्येकाच्या तोंडाला बांधला होता . जेणे करुन दुसरे कोणी त्यात तोंड घालणार नाही . ” याला म्हणतात आरक्षण ,

यावर अॅड . गणपत अभ्यंकराने मान खाली घातली . त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले . त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज अभ्यंकरांना म्हणाले , ” अभ्यंकर , जाती माणसात नसतात , जनावरात असतात . परंतु तुम्ही जनावरांची व्यवस्था माणसाला लागू केली आणि मी माणसाची व्यवस्था जनावरांना लागू केली . “

यावर अभ्यंकर काय बोलणार ? चूप बसले . चिडीचूप झाले .

आणि म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे आद्यजनक आहेत . आरक्षणाचे नायक आहेत . आधुनिक भारतात संपूर्ण भारतात ब्राह्मणेतरांसाठी ५० टक्के आरक्षण देणारा एकमेव राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज होय .

राष्ट्रपिता जोतिराव फुलेंच्या Idea of Reservation ला अर्थात आरक्षण या संकल्पनेला आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या Implimentation of Reservation ला महामानव बाबासाहेब डॉ.भिमराव आंबेडकरांनी -भारतीय संविधानाद्वारे कायदेशीर रुप दिले . संस्थानातील आरक्षण संविधानात आणले . संपूर्ण देशात लागू केले .

कलम ३४० नुसार मराठा – कुणबी – ओबीसींना ५२ टक्के आरक्षण ,
कलम ३४१ नुसार – अस्पृश्यांना अर्थात एससींना १५ टक्के आरक्षण
कलम ३४२ नुसार आदिवासी अर्थात , एसटींना ७.५ टक्के आरक्षण

यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची व्यवस्था केली, आणि १०८ वर्षे सतत संघर्ष करुन मिळविलेले आरक्षण आज काँग्रेसचे ब्राह्मण , बीजेपीचे ब्राह्मण , कम्युनिस्टाचे प्राह्मण , सेनेचे ब्राह्मण , थोडक्यात सर्वच पक्षातील ब्राह्मण एल.पी.जी. अर्थात , उदारीकरण , खाजगीकरण व जागतिकीकरणाच्या माध्यमातून नष्ट करीत आहेत .

एल.पी.जी. च्या माध्यमातून संविधानाला हात न लावताच संविधान नष्ट करण्याचे षड्यंत्र सुरु केले आहे .

खरेतर एल.पी.जी मुळे आरक्षण शून्य झाले आहे . आणि आपले बांधव आरक्षणासाठी भांडत आहेत . म्हणून ओबीसी , एससी , एसटी व यातून धर्मपरिवर्तीत बांधव आणि महिलांनी आपापसात भांडत बसण्यापेक्षा राष्ट्रव्यापी जनआंदोलन निर्माण करायला पाहिजे .

उत्तर भारतात चमार विरुद्ध वाल्मिकी , राजस्थानात मीना विरुद्ध गुर्जर , दक्षिण भारतात माला विरुद्ध मादिगा तर महाराष्ट्रात सुरुवातीला महार विरुद्ध मातंग , महार विरुद्ध चांभार आणि आता मराठा – कुणबी विरुद्ध माळी आणि मराठा कुणबी विरुद्ध धनगर अशी ही भांडणे लावली जात आहेत .

यासाठी ओबीसी / एससी / एसटी यांच्यातील शिकल्या सवरलेल्या लोकांचा,लेखकांचा व विचारवंतांचा ही वापर केला जात आहे .

वापराचा एक सिद्धांत आहे . कोणता ?

ज्यांचा वापर होतो त्यांचे कधीच कल्याण होत नाही . म्हणून ओबीसी / एससी / एसटी व यातून धर्मपरिवर्तीत आणि महिलांनी एकत्र येऊन हे दुसरे स्वातंत्र्याचे आंदोलन निर्माण करायला हवे तरच शिव-फुले-शाहू-पेरियार-आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण होऊ शकेल .

Dipak Ingale बंधु यांच्या वाॅलवरुन साभार…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp