
मुंबई : शेतीच्या मालकीहक्कात अडथळा आणणाऱ्या मयत खातेदारांच्या नावांची ७/१२ उताऱ्यावरून नोंद कमी करण्यासाठी मोठा निर्णय!
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबवली जाणार आहे!
या निर्णयामुळे काय फायदा होणार ?
सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होईल. खरेदी-विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होतील. शेतीविषयक कर्ज मिळवणे सोपे होईल. वारसांमध्ये मालकीहक्का संदर्भातील कायदेशीर वाद टाळता येतील.
महत्त्वाच्या तारखा:
१ ते ५ एप्रिल – तलाठी गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करून चावडी वाचन करतील.
६ ते २० एप्रिल – वारसांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याची संधी.
२१ एप्रिल ते १० मे – ई-फेरफार प्रणालीद्वारे सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी केली जाईल.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे:
✔ मृत्यू दाखला
✔ वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र
✔ पोलिस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला
✔ सर्व वारसांची माहिती (नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक)
✔ रहिवासी पुरावा
संपूर्ण प्रक्रिया मोफत!
कोणत्याही दलालाला किंवा अधिकाऱ्याला पैसे देऊ नका! महसूल विभागाने ही मोहीम पूर्णतः मोफत असल्याचे जाहीर केले आहे.
प्रशासनाची जबाबदारी:
तहसीलदार – तालुका स्तरावर समन्वय साधतील.
जिल्हाधिकारी – संपूर्ण मोहीम वेळेत पार पडेल याची जबाबदारी सांभाळतील.
विभागीय आयुक्त – राज्यभरातील प्रगतीवर देखरेख ठेवतील.
सातबाऱ्यावर आपला हक्क मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी दवडू नका! महसूल विभाग, महाराष्ट्र सरकार.७/१२ उताऱ्यावरील मयतांची नावे हटणार अन् वारसांची नोंद होणार !
🔸१ ते २१ एप्रिल दरम्यान सुवर्णसंधी !
मुंबई : शेतीच्या मालकीहक्कात अडथळा आणणाऱ्या मयत खातेदारांच्या नावांची ७/१२ उताऱ्यावरून नोंद कमी करण्यासाठी मोठा निर्णय!
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबवली जाणार आहे!
या निर्णयामुळे काय फायदा होणार ?
सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होईल. खरेदी-विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होतील. शेतीविषयक कर्ज मिळवणे सोपे होईल. वारसांमध्ये मालकीहक्का संदर्भातील कायदेशीर वाद टाळता येतील.
महत्त्वाच्या तारखा:
१ ते ५ एप्रिल – तलाठी गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करून चावडी वाचन करतील.
६ ते २० एप्रिल – वारसांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याची संधी.
२१ एप्रिल ते १० मे – ई-फेरफार प्रणालीद्वारे सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी केली जाईल.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे:
✔ मृत्यू दाखला
✔ वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र
✔ पोलिस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला
✔ सर्व वारसांची माहिती (नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक)
✔ रहिवासी पुरावा
संपूर्ण प्रक्रिया मोफत!
कोणत्याही दलालाला किंवा अधिकाऱ्याला पैसे देऊ नका! महसूल विभागाने ही मोहीम पूर्णतः मोफत असल्याचे जाहीर केले आहे.
प्रशासनाची जबाबदारी:
तहसीलदार – तालुका स्तरावर समन्वय साधतील.
जिल्हाधिकारी – संपूर्ण मोहीम वेळेत पार पडेल याची जबाबदारी सांभाळतील.
विभागीय आयुक्त – राज्यभरातील प्रगतीवर देखरेख ठेवतील.
सातबाऱ्यावर आपला हक्क मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी दवडू नका!
महसूल विभाग, महाराष्ट्र सरकार.